मुंबई – पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. सचिन वाझेंची कसून चौकशी केल्यानंतर NIA ने त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वाझेंच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारणातील घडामोडींना चांगलाच आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे, राज्यात सुरु असलेल्या सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकारची बदनामी होत आहे, दुपारी १२ च्या सुमारास शरद पवार वर्षावर पोहचले होते, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांची गाडी आणि या प्रकरणात पोलीस सचिन वाझे यांना NIA ने अटक केली आहे, त्यामुळे या मुद्द्यावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं कळतं आहे.
वर्षा निवासस्थानी अर्धा ते पाऊण तास शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक म्हणून काम करतात, सचिन वाझे प्रकरणानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे, सचिन वाझे प्रकरणी ठाकरे सरकारच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या काही तास बैठक चालली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मुख्यमंत्र्यांच्या भेट घेतली. त्यानंतर अनिल परब देखील वर्षावर दाखल झाल्याचे समजते आहे. वाझे प्रकरणी ठाकरे सरकारची चांगलीच अडचण झालेली आहे.
तर या सर्व महाविकास आघाडीच्या अडचणीनंतर शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे. दोन सत्रात ही बैठक होणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून ते मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे अटकेपर्यंत या ना त्या मुद्यांमुळे महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुंबई महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सचिन वाझे, संजय राठोड, धनंजय मुंडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेना राष्ट्रवादीमध्ये झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार आजच्या बैठकीत घेणार आहेत. यातच विरोधकांनी सचिन वाझे प्रकरणात आक्रमकपणे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत, यातच NIA ने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनलं आहे.
दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरून हटवावं अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वाकारावी. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळणं आणि या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक होणं, त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, मुंबई पोलीस दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांना हटवण्याची राष्ट्रवादीची आग्रही मागणी आहे
आयुक्तांना हटवणार असाल तर गृहमंत्र्यांना हटवा सचिन वाझे प्रकरणानंतर राष्ट्रवादीने मुंबई पोलीस आयुक्त हटवण्याची मागणी केली असताना आता शिवसेनेचा एक गट आयुक्तांना हटवायचं झालं तर गृहमंत्र्यांनाही हटवण्याची मागणी करत हे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच अधिवेशनातही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाधानकारक कामगिरी केली नाही. संजय राठोड असो वा सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री सरकारची बाजू सांभाळण्यास अपयशी ठरले असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना हटवण्याची मागणीही शिवसेनेच्या एका गटाने केली असल्याची बातमी आहे.
त्यामुळे यासर्व प्रकारांनंतर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य म्हणजे महाविकासाआघाडीचे कर्ताधर्ता शरद पवार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.