अहमदनगर: सध्या भारत देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. मागच्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही भारतातील अनेक राज्यांचे मोठे नुकसान झाले होते. कोरोनामुळे अनेकांना आपले घरातील सदस्य,नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना गमवावे देखील लागले. कोरोनाच्या या गंभीर आजारावर लसीकरण हा उपाय समोर आलेला आहे. त्यातच आता भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत शास्त्रन्यांनी आणि भारतातील एम्सचे प्रमुख डॉ. रणजित गुलेरिया यांनी दिले आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत १८ ते त्यापुढील वयोगटातील नागरिकांना कोरोनाचा धोका होता आणि कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाणही त्यांच्यातच जास्त प्रमाणात दिसून आले आहे. कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेत मात्र १८ वर्षाखालील गटाला आणि बालकांना देखील कोरोनाचा विळखा बसणार असे सांगण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात मात्र गेल्या तीन महिन्यांपासून तब्ब्ल १८ हजार ६५४ बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे अशी आकडेवारी समोर आली आहे. राज्य शासनाने दिलेल्या आकडेवारी मध्ये ही संख्या समोर आली आहे.
Maharashtra | 9,928 minors in Ahmednagar tested Covid positive in May
"Children positivity rate increased due to rise in overall positivity rate. In April, 7,760 children were tested positive. No serious incidents were reported," said Civil surgeon Sunil Pokharna (31.5) pic.twitter.com/OqGMCHm6GA
— ANI (@ANI) June 1, 2021
अहमदनगर जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यात १ हजार ६३१, एप्रिलमध्ये ७ हजार ६०७ आणि मे महिन्यात ९ हजार ४१६ मुलांना कोरोनाची बाधा झालेली आहे. या महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८० हजार ७८५ एवढी होती. त्यात ९ हजार ४१६ मुलांचा समावेश होता म्हणजेच एकूण बाधितांच्या टक्केवारीत मुलं बाधित होण्याचे प्रमाण ११.६५टक्के एवढे आहे. याबाबत अहमदनगर जिल्हाशल्यचिकित्सालक सुनील पोखरना यांनी माहिती दिली आहे. लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.