कोरोना व्हायरस महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक महिने कंपन्या बंद असल्याने हजारो लोकांचे रोजगार केले. बेरोजगारीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र याच कालावधीमध्ये राज्यात कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता विभागाने हजारो जणांना रोजगार मिळवून दिला आहे.
तरी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार देण्यात आला.लॉकडाऊनच्या काळात एकूण ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.(२/६)#SkillsDevelopment#Maharashtra
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 25, 2020
राज्याच्या कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत लॉकडाऊनच्या काळात 39 हजार 287 बेरोजगारांना रोजगार दिला. याबाबतची माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. एप्रिल ते जून याकाळात 17 हजार 715 तर जुलै महिन्यात तब्बल 21 हजार 572 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.
यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरी इच्छूक तरुणांनी https://t.co/2tRaapcbss या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी.(५/६)#SkillsDevelopment#Maharashtra
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 25, 2020
तसेच, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले असून, या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करू शकतात. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांनी या पोर्टलवर नोंदणी करावी.