पुणे : केंद्र सरकार आणि सिरम इस्न्टिट्यूट यांच्यात लसींच्या पुरवठ्यावरून सुरु असलेल्या राजकारणाला एक नवीन वळण सिरमकडून लागण्याचे दिसून येत होते. देशात सध्या भासत असलेल्या लसींच्या तुटवड्याला अंशतः केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा दावा सिरमने केला होता. या पार्श्वभूमीवर बोलत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सिरम इस्न्टिट्यूटकडून केल्या गेलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, ‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’ या वक्तव्याशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे सीरमकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी म्हटलं होते की, “देशानं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) घालून दिलेल्या नियमांचं आणि सांगितलेल्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करायला हवं आणि एखाद्या वस्तूची उपलब्धता पाहूनच, त्याच्या वापराबाबत योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे. केंद्र सरकारनं लसींच्या उपलब्ध साठ्याबाबत कुठलीच माहिती न घेता १८ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली”, असे त्यांनी म्हटले आहे.
यावरून चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, सिरमकडून करण्यात आलेला दावा हा सिरमचा अधिकृत आरोप नाही. कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केलेला आरोप सिरम ग्राह्य धरत नसून याबाबत त्यांनी खुद्द स्पष्टीकरण दिले आहे. केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारचा अन्याय केल नाही. लसीकरण तातडीने पुर्ण करण्याचा केंद्र सरकार पाठपुरवठा करत आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत ४५ कोटी ढोस मिळतील, त्यामुळे लसीकरणाला वेग येईल, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ल़ॉकडाऊन मुळे उपासीमार होणाऱ्या नागरिकांना आम्ही ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमा अंतर्गत गरजुंना धान्य किट वाटप करत आहोत. आम्ही अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला परंतू संचारबंदीमुळे त्यावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही, लॉकडाऊनमुळे सार्थीची वाट लागली, उद्धव ठाकरे याबाबत कोणतेही उत्तर देत नाहीत. मी त्यांना परत एकदा ई-मेलव्दारे निवेदन देणार आहे. आम्ही प्रत्येक मतदारसंघा अंतर्गत प्रत्येकी दोन रुग्णालयात मोफत लसीकरणाचा उपक्रम राबवणार आहोत. जेणेकरून गरिब-गरजू नागरिकांना याचा फायदा होईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
सीरमकडून स्पष्टीकरण..!
सीरमकडून कोणत्याही प्रकारचं विधान करण्यात आलेलं नाही. जाधव यांच्या विधानाशी आमचा संबंध नाही. तसेच जाधव यांनी जे सांगितलं तो आमचा विचार नाही. हे मी तुम्हाला सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्यावतीने सांगत आहे, असं सिंह यांनी या पत्रात म्हटलं आहे. कोविशील्डचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच कोविड 19विरोधातील लढाईत आम्ही सरकारच्या सोबत आहोत, असं सांगतानाच पुनावाला हेच आमच्या कंपनीचे एकमेव अधिकृत प्रवक्तेही असल्याचं प्रकाश कुमार सिंह यांनी म्हटलंय.