नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दोन्ही अपक्ष उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने याठिकाणी आता थेट भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादीत लढत निश्चित झाली आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार भारती पवार यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे यांच्यावर शरद पवारांनी विश्वास टाकला आहे.
भारती पवारांना पक्षाकडून पुन्हा संधी दिल्यानंतर माजी खासदार हरिचंद्र चव्हाण भाजपवर नाराज झालेत. त्यानंतर हरिचंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भारती पवार यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्णाम झाल्या. अशातच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चव्हाणांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जीवा पांडू गावित यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आघाडीचे उमेदवार भगरे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला. यानंतर गावित यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी देखील आपला अर्ज मागे घेतला. यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत असतांना आता दुरंगी लढत निश्चित झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा..भोसरीतील गावजत्रा मैदानासाठी महायुती-महाविकास आघाडीत ‘रस्सीखेच’, दोन नेते आमनेसामने