पिंपरी चिंचवड : सध्याची निवडणुक ही गल्लीची नसून दिल्लीची आहे. परंतु आपल्याकडे जे नेते येतात ते गल्लीतलं भाषण करतात. गद्दार, खोके, बोके त्याच्या पलिकडेच जातच नाहीत. असं म्हणत ज्या बाळासाहेबांनी कॉंग्रेससोबत युती करण्याची वेळ येईल. त्यावळी माझ्या शिवसेनेचे दुकान बंद करीन म्हटलं होतं. त्याच कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत. असा हल्लाबोल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी पिंपरीत जाहिर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मावळ मतदारसंघातील गावकी-भावकीवर देखील मोठं भाष्य केलं. जेव्हा आपण तीन-चार पक्ष म्हणून एकत्रित काम करत असतो. त्यावेळी अनेक वेळा लग्नासारखा मान अपमान चालतो. लग्नात याला खुर्ची दिली का ? त्याला खुर्ची दिली का ? असं चालतं. परंतु आपल्या सगळ्यांच्या घरचं लग्न आहे. अन् हे लग्न सगळ्यांनी अंगावर घेऊन काम केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून काम केलं तर याठिकाणी एक मोठा विजय होईल. असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.
चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण भाऊंची पुण्याई फार मोठी आहे. त्याठिकाणी लाखांचं मताधिक्क मिळेल. तर पिंपरीत अण्णा बनसोडे असतील तसेच या सगळ्या मतदारसंघातल्या मावळ पासून ते कोकणापर्यंत रेकॉर्ड ब्रेक मतदान बारणेंना होईल. अन् नरेंद्र मोदी यांनी जोर चारशे पार चा नारा दिला आहे. त्यातच बारणेंचा नंबर लागेल. असेही ते म्हणाले.
दरम्यान, त्याआधी देवेंद्र फडणवीस हे भाषण करण्यासाठी उठले असता खालून चारसे पार च्या घोषणा कार्यकर्त्यांकडून सुरू झाल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या घोषणांना देवेंद्र फडणवीस यांनी देखील दाद दिली. यावेळी भाषण थांबवत अन् चार सो पार मैं, अप्पा बारणे खासदार अस म्हणताच देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाला उपस्थित लोकांनी मोठा प्रतिसाद दिला.
READ ALSO :
हेही वाचा..भोसरीतील गावजत्रा मैदानासाठी महायुती-महाविकास आघाडीत ‘रस्सीखेच’, दोन नेते आमनेसामने