मुंबई : मुंबईतील २६/११ च्या पाक पुरस्कृत दहशदवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतून लागली नव्हती, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ती गोळी एका आरएसएस समर्थक पोलीस अधिकाऱ्याने चालवली होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. एका पुस्तकाचा आधार सांगत वडेट्टीवार यांनी हा आरोप केला आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी गलिच्छ पातळी गाठणाऱ्यांचा ‘निवडणूक प्रचार’ करण्याचा अधिकार काढून घ्यावा आणि विजय वडेट्टीवर यांच्या विरोधात FIR दाखल करावी, अशी मागणी मंत्री लोढा यांनी केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, कॉंग्रेसच्या नेत्यांना कसाबचा अपमान दिसला, पण मुंबईकरांचं दु: ख वेदना दिसल्या नाहीत. हा शहिदांचा अपमान आहे. ज्या कसाबने मुंबईवर हल्ला केला. तो हल्ला परतून लावण्यासाठी मुंबी पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवानांनी शौर्य गाजवलं. पण हे शौर्य गाजवणाऱ्या शहिदांचा, पोलिसांचा अपमान आहे. कसाबला जिवंत पकडण्यासाठी पोलीस हवालदार तुकाराम ओंबाळे यांनी अंगावर गोळ्या घातल्या. ही देशभक्ती आहे. कसाब संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे शहिदांचा अपमान झाला. अशा देशद्रोही विधान करणाऱ्या नेत्यांचा बदला जनता घेईल. असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांचे शहीद हेमंत करकरे यांच्या हौतात्म्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोषी धरणे म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाणे असल्याचे रोखठोक मत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे. एक्स (ट्वीटर) च्या माध्यमातून त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल स्पष्ट मत मांडले आहे.
हेही वाचा..“बारामतीत दोन्ही पवारांची विचारधारा आता भिन्न झाली”, फडणवीसांचं मोठं विधान
देशभक्तांना धारेवर धरणे आणि दहशतवाद्यांचा उदोउदो करण्याची काँग्रेसी वृत्ती पुन्हा एकदा आज चव्हाट्यावर आली आहे! आपल्या तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी गलिच्छ पातळी गाठणाऱ्यांचा ‘निवडणूक प्रचार’ करण्याचा अधिकार काढून घ्यावा आणि विजय वडेट्टीवर यांच्या विरोधात FIR व्हावी, अशी मागणी मंत्री लोढा यांनी यावेळी केली आहे.
“विजय वडेट्टीवार यांनी निरधार आरोप केले असून याबद्दल मला वाईट वाटतंय. यामुळे पाकिस्तान सरकारला फायदा होऊ शकतो. ते असे दावे कशाच्या आधारे करत आहेत? हे मला माहीत नाही. राजकारणात गुंतून तुम्ही आमच्या देशाची प्रतिमा मलिन करत आहात याचं आश्चर्य वाटतं. असे आरोप करून विरोधी पक्षनेते २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा अनादर करत आहेत. ज्यांना माझ्या उमेदवारीची भीती वाटते ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत.” अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा..भोसरीतील गावजत्रा मैदानासाठी महायुती-महाविकास आघाडीत ‘रस्सीखेच’, दोन नेते आमनेसामने