बारामती : गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या बारामती मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. काल दोन्ही बाजूंच्या सांगता सभा पार पडल्या. या सभांमधून दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केलेत. अशातच बारामतीत जिंकतील तर पवारच पण सुनेत्रा पवार जिंकल्या तर त्या मोदींच्यासोबत आहेत. तर सुप्रिया सुळे जिंकल्या तर त्या राहुल गांधींसोबत आहेत. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीच्या सर्वच नेत्यांच्या सभा पार पडल्या. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी स्वत: शरद पवार बारामतीत तळ ठोकून बसले होते. अशातच काल मिशन बंगल्यासमोर अजित पवारांची सांगता सभा पार पडली. तर मोरेगाव येथे शरद पवारांची सुप्रिया सुळेंसाठी सभा पार पडली.
हेही वाचा…बारामतीत मडकं फुडलं अन् राजकीय वातावरण तापलं, पाहा नेमकं काय घडलं ?
बारामतीत जिंकतील तर पवारच. परंतु सुनेत्रा पवार जिंकल्या तर त्या मोदी यांच्यासोबत आहेत. सुप्रिया सुळे जिंकल्या तर त्या राहुल गांधी यांच्यासोबत आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये ३७० कलमापासून तर वेगवेगळे कायदे या देशाच्या संसदेत मोदींनी आणले. त्या प्रत्येकाला विरोध करण्याचं काम हे बारामतीच्या खासदारांनी केलं. अशी खोचक टिका देखील फडणवीसांनी केली.
दरम्यान, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार जिंकल्या तर त्या ३७० आणण्याच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत. बारामतीमध्ये सुनेत्राताई जिंकल्या तर त्या राम मंदिर बनवणाऱ्यांच्या बाजूने ते उभे राहणार आहेत. त्या ठिकाणी सुनेत्राताई जर जिंकल्या तर त्या समान नागरी कायदा आणणाऱ्यांच्या बाजूने त्या उभे राहणार आहेत. दोन्हीही पवारच आहेत. परंतु दोन्ही पवारांची विचारधारा आता भिन्न झाली. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…नाशकात ठाकरे गटाला मोठा धक्का, विजय करंजकर यांचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…“मोदी सरकारचे निर्णय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवा,” बारणेंसाठी चित्रा वाघ मैदानात
हेही वाचा…“फार उड्या मारू नका, निवडणूक औटघटकेचीच”, अजित पवारांनी डिवचलं
हेही वाचा…“लोकांवर भुरळ पाडून फक्त धादांत खोटे बोलून..,”आढळरावांची कोल्हेंवर सडकून टिका