रायगड : राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील प्रचार रविवारी थंडावला. रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनील तटकरे यांना रायगड आणि कोकणच्या विकासासाठी निवडून द्या असे आवाहन केले.
हेही वाचा…बारामतीत मडकं फुडलं अन् राजकीय वातावरण तापलं, पाहा नेमकं काय घडलं ?
एका व्हिडओ द्वारे तटकरे यांना निवडून देण्याचे आवाहन करताना शिंदे म्हणाले की, यंदा असलेली लोकसभा निवडणूक ही कोणत्या व्यक्तीची नाही, तर देशाचे नेतृत्व निवडण्याची निवडणूक आहे. जगभरात आपल्या देशाचे नाव रोशन करणारी ही निवडणूक आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे हाडाचे कार्यकर्ते असून त्यांनी नेहमीच आपल्या लोकसभा मतदारसंघात जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत, त्यांच्याशी जनसंपर्क ठेवलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना जनतेने मतदान करावं असं मी आवाहन करतो.
हेही वाचा..“भाजपला महाराष्ट्रात ४१ जागा जिंकणे कठीण?” सर्व्हेक्षणात आली माहिती समोर
रायगड लोकसभा मतदारसंघात यापूर्वी ए. आर. अंतुले साहेबांनी फार मोठे काम केले आहे , त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत हा त्यांचा पट्टशिष्य आता पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभा राहिला आहे. खासदार असताना केलेली त्यांची विकास कामे हे त्यांच्या कामाची पावती देतात. सर्वसामान्य कार्यकर्ता आणि सर्वसामान्य जनतेचा नेता अशी सुनील तटकरे यांची ओळख आहे. गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारने केलेली काम आणि महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारने रायगड लोकसभा मतदारसंघात केलेली काम यांना सुनील तटकरे यांच्या कामाची जोड आहे. येणाऱ्या ७ तारखेला सुनील तटकरे यांच्या नावासमोरील घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून जनतेने त्यांना निवडून आणावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नाशकात ठाकरे गटाला मोठा धक्का, विजय करंजकर यांचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…“मोदी सरकारचे निर्णय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवा,” बारणेंसाठी चित्रा वाघ मैदानात
हेही वाचा…“फार उड्या मारू नका, निवडणूक औटघटकेचीच”, अजित पवारांनी डिवचलं
हेही वाचा…“लोकांवर भुरळ पाडून फक्त धादांत खोटे बोलून..,”आढळरावांची कोल्हेंवर सडकून टिका