मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण हे गावकी-भावकीवर असल्याचे सगळ्यांना माहिती आहे. याठिकाणी गावकी ज्यांच्या बाजूने उभी राहिल, तो निवडणुकीत बाजी मारेल, असं गणित आजपर्यंत राहिलं आहे. अशातच आज महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी प्रचार सभा पार पडली. यावेळी आमच्या मतदारसंघात २५ लाख मतदार हे माझे नातेवाईक आहे. त्यांच्यामुळेच मला दोनवेळा संसदेत जाण्याची संधी मिळाली, असं विधान श्रीरंग बारणे यांनी केले.
श्रीरंग बारणे यांच्यासाठी महायुतीची जाहिर सभा आज पिंपरीत पार पडली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे सर्वच स्थानिक नेते उपस्थित होते. अशातच यावेळी बारणे म्हणाले की, सध्या आमच्या मतदारसंघातील विरोधी उमेदवारांकडे कुठलेही विकासाचं काम नाही. त्यामुळे ते विविध मुद्दे घेऊन टिका करत असतात. यातच विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणतो की माझे नातेगोते मोठे आहेत. परंतु त्यांना मला सांगायचं आहे की, या मतदारसंघात २५ लाख मतदार माझे नातेवाईक आहेत. त्याच नातेवाईकांनीच मला दोन वेळा लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.
पुढे बोलतांना बारणे म्हणाले की, मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद आहेच, पंरतु 2019 साली भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे खासदार झालो. देशातच जितके प्रतिनिधी संसदेत निवडून जातात. त्यात ५४३ खासदारांमधअये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न मांडणे, उपस्थिती दाखवणं, आणि तुमच्या प्रश्नाला वाचा फोडण्याच्या संदर्भामध्ये पहिल्या क्रमांकावर किंवा दुसऱ्या क्रमांकावर आजपर्यंत राहिलो. केंद्र सरकारने, राज्य सरकारच्या मदतीने याठिकाणी काम करण्यासाठी मला पुन्हा निवडून द्या. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
READ ALSO :
हेही वाचा…“गल्लीतले नेते येतात अन् म्हणतात खोके, बोके, गद्दार”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा..भोसरीतील गावजत्रा मैदानासाठी महायुती-महाविकास आघाडीत ‘रस्सीखेच’, दोन नेते आमनेसामने