विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अन्यायग्रस्त तरुणांना मदत करणायचा निर्णय झाला होता. पण हा निर्णय केवळ कागदावरच ठेवला होता. या निर्णयाची अंमलबजावणी मात्र झाली नव्हती. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र ते करून दाखवलं.
महविकासआघाडी सत्तेवर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई आणि संघटनेचे कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी वैद्यकीय शिक्षण खात्याकडे पाठपुरवठा केला.
वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनीही या प्रकरणात लक्ष घटने आणि तरुणांना न्याय मिळवून दिला त्यानुसार बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या तरुणांना न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला.