मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर कंगनाला केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा देऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र अनेकांना प्रश्न पडला होता की मुंबईचा अपमान करून देखील कंगनाला केंद्राने सुरक्षा का बरे दिली ? एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात भाजप आमदार आशिष शेलार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबईबइला पाकिस्तान म्हणणाऱ्या अभिनेत्रीला केंद्र सरकारने सुरक्षा कशी दिली असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांना विचारण्यात आले. ज्यांनी कसाबला सुरक्षा दिली त्यांनी कंगनाच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही असे म्हणत आशिष शेलार यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
तसेच कसाबला कोणी सुरक्षा दिली ? त्यांच्यासोबत सत्तेत बसायचं हे कितपत योग्य आहे असे मत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई पोलिसांना क्षमतेनुसार काम करून दिल जात नाही असा आरोप देखील यावेळी बोलताना शेलारांनी केला.
Read Also
दोन्ही ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे का ? यावर संजय राऊत म्हणतात…https://t.co/N5cWg0yw4C@RajThackeray @CMOMaharashtra @rautsanjay61
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 14, 2020