लॉकडाऊननंतर आता सरकारने काही नियमांसह चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. मात्र यात 65 वर्षावरील कलाकारांना सेटवर काम करता येणार नाही, अशी अट ठेवण्यात आलेली आहे. या निर्णयाला आता विरोध होताना दिसत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. असा कायदा आणण्याआधी राजकारणातील 60 वर्षापुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असे विक्रम गोखले म्हणाले.
ते म्हणाले की, 65 वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळे त्याला सरकारने परवानगी द्यावी. केंद्राच्या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकार याबाबतचा कायदा करणार असल्याचे बोलले जात आहे. ते चुकीचे आहे. हा कायदा केल्यास ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील.