कोल्हापुर: कोल्हापुरात नुकतीच (जिल्हा दूध उत्पादक संघ ) गोकुळ ची निवडणूक पार पडली. सत्ताधारी महाडिक -पी.एन.पाटील गटाचा यामध्ये मोठा पराभव झाला. हसन मुश्रिफ आणि सतेज पाटील गटाने निवडणुकीत बाजी मारत तब्ब्ल २५ वर्षानंतर सत्ता परिवर्तन केले. पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यातील वाद सर्व कोल्हापूर जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. आता गोकुळच्या निवडणुकीनंतर हा वाद पुन्हा एकदा तापलेला दिसत आहे. माजी आमदार अमल महाडिक यांनी फेसबुक वर केलेल्या पोस्ट वरून हा वाद वाढला आहे.
माजी आमदार अमल महाडिक यांनी नुकतीच फेसबुक वर पोस्ट करत जिल्ह्याच्या कोरोनाच्या गंभीर परिस्थिती बद्दल निर्णय घेण्यात दिरंगाई करणाऱ्या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी टीका केली. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या रोखण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत आहे. राजकीय नेत्यांनी त्यांच्या सवडीप्रमाणे जिल्ह्याच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयांमुळे आज जिल्ह्याला गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
माजी आमदार अमल महाडिक यांच्या टीकेला शारगंधर देशमुख Shargandhar Deshmukh यांनी लगेचच उत्तर दिले आहे. त्यांनी माजी आमदार अमल महाडिक Former MLA Amal Mahadik यांनी कोरोनाच्या या संकटकाळात असले राजकारण करू नये असे म्हटले आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही मंत्री आणि सर्व आमदार हे कोरोना विरुद्धच्या लढाईत सक्रिय आहेत. अमल महाडिक यांनी सोशल मीडियावर असे आरोप करणे हे अपरिपक्व्तेचे लक्षण आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारकडे त्यांचे चुलत बंधू असलेल्या खासदारांनी लसींच्या आणि रेमेडीसीवर च्या बाबतीत काही प्रयत्न केले आहेत का ? अशी टीका देखील केली आहे.