मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांवरील अपात्रतेवरील याचिकेसोबत पाच याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. शिवसेनेचे वकिल कपिल सिब्बल आणि तुषार महेतांमध्ये युक्तिवाद झाला. सत्तासंघर्षात राज्यपालांची भूमिका होती असा दावा देखील सिब्बल यांनी केला आहे. यावर आता काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत, गद्दार म्हणता तरी शांत, म्हणून काय ठार माराल का?”
सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीतून शिंदे फडणवीस सरकार इतके दिवस झाले तरी मंत्रीमंडळ विस्तार का करत नाही याचे कारण जनतेला कळले असेल, असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपला सुनावलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेचे पक्षप्रमुख असल्याचा दावा केला. त्याचबरोबर शिंदे गट देखील उद्धव ठाकरे यांनाच आपला पक्षप्रमुख मानत आहे.
“आदित्य ठाकरेंच्या सभेचं नियोजन करणाऱ्या व्यक्तीला अटक”; सामंतांच्या गाडीवर हल्ला
त्याचबरोबर मुख्यमंत्री कोणाला करायचं हे पक्ष ठरवत असतो त्याचा अधिकार आमदारांना नसल्याचंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं. तसेच व्हीप मान्य केला नाही तर आमदार अपात्र कसे ठरतात याबाबत ही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. तसेच सभागृहातील पक्ष हा मुळ राजकीय पक्षाचा एक छोटासा भाग आहे. गट वेगळा असला तरी शिंदे गटातील आमदार शिवसेनेचेच सदस्य असून गुवाहाटीला बसून मुळ राजकीय पक्ष कोणता ते ठरवता येणार नसल्याचंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
“33 दिवस झालेत, परंतु मंत्रिपदाच्या लायकीचा तिसरा माणूस अजूनही सापडलेला नाही”
त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. विलिनीकरण हाच शिंदे गटापुढे एकमेव पर्याय असे सांगाताना पक्षांतर बंदी कायदा डोक्यावर घेतला जात आहे. सर्व बंडखोर अपात्र ठरले तर सरकारने घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरतील असं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेने अंतर्गत अनेक अडचणी असल्याचा कपिल सिब्बल यांचा वाद चुकीचा असं देखील हरीश साळवे म्हणाले. त्याचबरोबर हरिश साळवे यांनी 1969 मधील काॅंग्रेस फुटीचा दाखला देत आम्ही एकाच पक्षाचे मात्र नेता कोण हा प्रश्न आहे ? पक्षात दोन गट पडू शकत नाही का ? असा सवाल देखील हरिश साळवे यांनी केला. पक्षांतर बंदी कायदा डोक्यावर घेतला जात आहे, असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे. सर्व बंडखोर अपात्र ठरले तर सरकारने घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरतील, असंही शिवसेनेच्या वकिलाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आहे.
Read also
- “शिंदे गटावर पक्षांतर बंदी कायदा डोक्यावर घेतला जात आहे”
- “गुवाहाटीला बसून मुळ राजकीय पक्ष कोणता ते ठरवता येणार नाही”; कोर्टात शिंदे- ठाकरे वकिलांचा युक्तिवाद
- उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला; पोलिसांचं पुण्यापासून थेट हिंगोलीपर्यंत अटक सत्र
- “भाजप हिंदुत्वाचे गोडवे गातो अन् स्मृती ईराणीची मुलगी गोव्यात गोमांस विकतेय”
- “भाजप हिंदुत्वाचे गोडवे गातो अन् स्मृती ईराणीची मुलगी गोव्यात गोमांस विकतेय”