मुंबई : गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल, असं वक्तव्य हिंगोलीचे शिवसेनेचे नेते बबनराव थोरात यांनी केलं. त्यानंतर सायंकाळी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाड्याच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी दगडफेक केली.
अजित पवार राज्यपालांच्या भेटीला; राज्यपालांकडे केली ‘ही’ मागणी
आदित्य ठाकरे यांचा शिवसेना संवाद पुण्यातील कात्रज चौक भागात होती. त्याचवेळी आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानामधून शिंदे आणि सामंत यांच्या गाड्यांचा ताफा बाहेर पडला. आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाला. यावेळी सामंत यांच्या ताफा कात्रज सिंग्नलला थांबला असता शिवसैनिक आक्रमक झाले. त्यानंतर उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक, चप्पलफेक केली. यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीची मागची काच देखील फुटलीय.
50 बंडखोर आमदारांसाठी भाजपने अडीच हजार कोटी आणले कुठून? राष्ट्रवादीचा सवाल
उदय सामंत यांच्या गाड्यावर हल्ला केल्याप्रकरणी पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत होती. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद सभेच्या आयोजकांसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय या हल्ल्याला चिथावणी देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी हिंगोलीचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांना पुण्यातील कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारकडून ST महामंडळाला 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर
दरम्यान, उदय सामंत यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी राजेश पळसकर, चंदन साळुंके, सुरज लोखंडे आणि रूपेश पवार यांना अटक करण्यात आले आहे. सोबतच १५ जणांवर देखील गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्रभर शोधमोहिम राबवून पहाटे ५ वाजेपर्यंत ही कारवाई केली.
Read also
- “भाजप हिंदुत्वाचे गोडवे गातो अन् स्मृती ईराणीची मुलगी गोव्यात गोमांस विकतेय”
- “भाजप हिंदुत्वाचे गोडवे गातो अन् स्मृती ईराणीची मुलगी गोव्यात गोमांस विकतेय”
- “आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत, गद्दार म्हणता तरी शांत, म्हणून काय ठार माराल का?”
- “आदित्य ठाकरेंच्या सभेचं नियोजन करणाऱ्या व्यक्तीला अटक”; सामंतांच्या गाडीवर हल्ला
- “33 दिवस झालेत, परंतु मंत्रिपदाच्या लायकीचा तिसरा माणूस अजूनही सापडलेला नाही”