मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर इडीने कारवाई केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राऊतांच्या घरातून इडीने 11 लाख रूपयांचा रोकड जप्त केली आहे. त्यावरून आता विरोधी पक्षांनी इडी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी केंद्र सरकार आणि भाजपला जहरी सवाल केला आहे.
इडी, सत्ताधीशवाले तुम्हाला एकतर तुरूंगात, नाहीतर मारून टाकतील; यशोमती ठाकुरांचा गंभीर आरोप
ईडी जणू भाजपची घरगडी असल्यासारखे वागत आहे. मी स्वत: ईडीकडे तीन तक्रारी केल्या. ५० आमदार फोडण्यासाठी आलेल्या पैशाचा स्रोत काय, याची चौकशी करण्याचा आग्रह धरला. प्रत्येक आमदाराला ५० कोटी दिले, तिथेच ५० आमदारांचे अडीच हजार कोटी होतात. भाजपाला देश लुटायला सर्व तपास आश्चर्य असे की, ही चौकशी देशाला देणं आहे. ५० आमदारांचे अडीच हजार कोटी आणले कुठून असे आणले याचा तपास झाला पाहिजे असे अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.
एकटेच मुख्यमंत्री सर्व खात्यांना न्याय कसा देणार? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर राज्यात मोठा भुकंप आला. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास 40 आणि इतर मिळून 50 आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शविला. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आल्याने सरकार कोसळलं. आणि त्याजागी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
“रात्री दहानंतर लाऊडस्पीकर लावता कामा नयेत”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना रोखठोक इशारा
दरम्यान, बंडखोर सेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगतील तलवार असल्याने राज्यात अजूनही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला नाही. त्यासंदर्भात येत्या 3 ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- शिंदे-फडणवीस सरकारकडून ST महामंडळाला 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर
- पिंपरी- चिंचवड प्राधिकरण अन् ‘पीएमआरडीए’चा संबंधच काय? आमदार महेश लांडगे
- “संजय राऊत आता दोन चार वर्ष बाहेर येणार नाही, याची खात्री”; संजय शिरसाठ
- “हे देखील पण दिवस लवकरच जातील”; प्रणिती शिंदें
- महाराष्ट्रातील सरकार म्हणजे ‘एक दूजे के लिए’ असे दोघांचेच सरकार