मुंबई : सत्ताधीशवाले इडी आणि सीबीआयशिवाय काहीही करू शकत नाहीत. ते तुम्हाला तुरूंगात टाकतील नाहीतर तुम्हाला मारून टाकू शकतात. असा गौप्यस्फोट काॅंग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी केलं आहे. त्यानंतर आता काॅंग्रेसच्याच नेत्या प्रणिती शिंदे यांनी देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपकडून लोकशाहीची हत्या केली जाते आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
देशात राजकारणाची पातळी ही खलावत आहे. सध्या जे राज्यात आणि केंद्रात सुरू आहे. ते लोकशाहीला घातक असून भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडून कुठेतरी लोकशाहीची हत्या केली जात आहे. केंद्रीय तपास संस्थांचा उपयोग सुरू आहे, हे सर्व देशभरातील नागरिक पाहत आहे. सध्या केवळ हम बोले सो कायदा अशी स्थिती असून सुरू राहिले तर हुकुमशाहीचा उदय झाल्याशिवाय राहणार नसल्याचेही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
“गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल”
केंद्रीय संस्थांचा अशाप्रकारे वापर आतापर्यंत कोणी केला नाही. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की, त्यामागे इडीची पिडा लावण्याचा प्रकार वाढत आहे. जो कोणी विरोधात आवाज उठवले त्यामागे चौकशी आणि कारवाई हे ठरलेले आहे. केंद्रात आणि राज्यात हेच प्रकार वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा सरकारवर विश्वास गमावून बसेल असेच सध्याचे चित्र आहे. मात्र हे अधिक दिवस चालणार नाही, हे देखील दिवस लवकर जातील असा विश्वास देखील प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
दोन मंत्र्यांच्या जम्बो कॅबिनेटमध्ये खरा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल
दरम्यान, मी सत्तांतराच्या वेळी बोलली तेव्हा मला भाजपच्या मोठ्या नेत्याचा फोन आला होता. ते मला या सर्व प्रकरणाबाबत बोलत होते. त्यावर मी त्यांनी विचारलं की, असं बोलणं बरोबर नाही. मी म्हटले की मला तुम्ही धमकी देता का ? असं म्हणत यशोमती ठाकुर यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तसेच जे सत्तेत बसले आहेत. ते दोनच काम करू शकतात. एक तर तुमच्यावर इडी किंवा सीबीआय लावू शकतात. नाहीतर बंदुक घेऊन मारून ठाकू शकतात. असा गंभीर आरोप यशोमती ठाकुर यांनी केला आहे.
Read also
- महाराष्ट्रातील सरकार म्हणजे ‘एक दूजे के लिए’ असे दोघांचेच सरकार
- इडी, सत्ताधीशवाले तुम्हाला एकतर तुरूंगात, नाहीतर मारून टाकतील; यशोमती ठाकुरांचा गंभीर आरोप
- एकटेच मुख्यमंत्री सर्व खात्यांना न्याय कसा देणार? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
- “रात्री दहानंतर लाऊडस्पीकर लावता कामा नयेत”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना रोखठोक इशारा
- मनसेला एकनाथ शिंदेंनीच पाडलं मोठं खिंडार; 100 पदाधिकाऱ्यांचा मनसेला जय महाराष्ट्र