मुंबई : राज्यातील सत्तानाट्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेलाच खिंडार पाडली आहे. मनसेतील जवळपास 100 कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष करून बहुमत चाचणीसाठी मनसेने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता.
मनसेचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांच्यासह कामगार सेनेमधील पदाधिकारी अशा 100 कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. अतुल भगत हे मागील 8 वर्षापासून जिल्हा अध्यक्ष पदावर विराजमान होते. सोमवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अतुल भगत आणि आजी माजी कार्यकर्त्यांनी सेनेता प्रवेश केला.
अलिकडेच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी कोकणचा दौरा केला होता. त्यामुळे अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. मनसे मधली अंतर्गत धुसफुस असल्याचे कारण देत अतुल भगत यांनी शिंदे गटात सामील होत असल्याचे सांगितलं आहे. उपतालुका अध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
“मुंबईचा पैसा, मुंबईच वैभव तुम्हाला गिळायचं “? उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकारण एका वेगळ्याच वाटेवर चाललं आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे देखील महाराष्ट्रा दौऱ्यावर असून त्यांच्या देखील सभा जोरदार होत आहेत. तसेच अमित ठाकरे देखील राजकारणात आता सक्रिय झाले आहेत.
Read also
- “माझ्या गाडीला साधा टच जरी झाला, तरी राजीनामा देईन”; संतोष बांगर अन् सेनेच्या नेत्यांमधील वाद विकोपाला
- “गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल”
- दोन मंत्र्यांच्या जम्बो कॅबिनेटमध्ये खरा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल
- “दारूवरचा कर कमी केला, पण पेट्रोल डिझेलवरचा कर कमी केला नाही”; विखे पाटलांचा सुळेंना टोला
- “चुकीचं प्रायश्चित्त म्हणून कृपया महाराष्ट्रातून चालते व्हा”; राष्ट्रवादीचा राज्यपालांना इशारा