नवी दिल्ली : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने जीएसटी परिषदेला पत्र लिहून जीवनावश्यक वस्तूंवर लावलेल्या जीएसटीला विरोध केला होता. जीएसटी परिषदेत केंद्र सरकारने बहुमत आहे. पण सरकारने हे सांगायला हवे की, जीएसटीबाबत होणाऱ्या निर्णयाचे कोणत्या राज्याने समर्थन केले आणि कोणत्या राज्याने विरोध केला. कारण सरकार जीएसटी परिषदेकडे बोट करत महागाईबाबत स्वतःची जबाबदारी अशा पद्धतीने टाळू शकत नाही. असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसदेत महागाईच्या चर्चेत बोलताना म्हणाल्या.
“भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”
नोटबंदी करण्याचा निर्णय सरकारचा चुकीचा होता. पण हे सरकार स्वतःची चूक मान्य करत नाही तर याबाबतही मागील साठ वर्षाच्या धोरणांचा दाखला देते. नोटबंदीनंतर बांग्लादेशचा कृषी विकास दर ८.२ टक्के आहे तर भारताचा अवघा ३.७, नोटबंदीमुळे विकासाला खीळ बसल्याचे सरकारने मान्य करायला हवे. सरकार प्रत्येकाला बँकेत खाते उघडण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मी सुद्धा माझ्या मतदारसंघात त्याबाबत जनजागृती करत असते. पण आजचे बँकाचे चित्र अस्वस्थ करणारे आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी, पैसे पाठवण्यासाठी, बँक स्टेटमेंटसाठी, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड यांसारख्या बँकेच्या जवळपास सर्व सेवांसाठी शुल्क आकारले जात आहे. स्वतःचे पैसे काढण्यासाठीच जर पैसे द्यावे लागत असतील तर लोक बँकेत पैसे का ठेवतील? सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
संजय राऊत यांना हृदयविकरचा त्रास; तुरूंगात घरचे जेवण, औषध देण्यास परवानगी
केंद्रात यापुर्वी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना तत्कालिन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज जोरदार भाषण करीत असायच्या. त्या म्हणायच्या की सामान्य माणसाला फक्त एवढेच कळते की तो जो पैसा खर्च करतो त्या बदल्यात त्याला काय मिळाले. महागाईवर आज चर्चा करत असताना केंद्रिय मंत्री वारंवार मागील साठ वर्षांचा दाखल देत आहेत. पण आता आपणही सत्तेत येऊन आठ वर्षे झाली आहेत. लक्षात घ्या, आठ वर्षे हा मोठा काळ असतो. घरात आलेली सुन देखील आठ वर्षांत व्यवस्थितपणे रुळते. आपणही सत्तेत रुळलेल्या आहात. त्यामुळे मागील धोरणांवर टिका करण्याऐवजी महागाई कमी करण्यासाठी पावले उचलायला हवीत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी; सामानाचा आवाज ४ दिवस जेलबंद
कृती दुबे या एका सहा वर्षाच्या मुलीने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ती तिच्या महाग झालेल्या पेन्सिलबाबत तक्रार करते. हे अतिशय महत्त्वाचे आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा देणाऱ्या सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लहानपणी आम्हाला एक कविता होती, ‘दत्त दत्त, दत्ताची गाय, गाईचे दूध, दूधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याचे तूप’ अशा त्यातील काही ओळी होत्या. या कवितेतील आज दत्त आणि गाय सोडले तर सर्व गोष्टींवर सरकारने जीएसटी आकारला.सरकारने जीवनावश्यक वस्तू जीएसटीमध्ये आणल्या. हे आवर्जून नमूद केले. महागाईवर चर्चा करीत असतात माननीय मंत्रीमहोदय म्हणतात की, “आम्ही देशातील गरीबाला गहू दिला. त्याबद्दल आभार मानणार नाही का?” त्यांचे हे विधान दुर्देवी आहे. कारण दोन वेळेचे अन्न हा त्या सामान्य माणसाचा अधिकार आहे. त्याला अन्न देणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. मग येथे तुम्ही आभाराची अपेक्षा कशी धरु शकता? सतत वाढत्या दराबाबत हे सरकार जीएसटी परिषदेकडे बोट दाखविते.
“मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचा असेल, तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध करावा”
स्वयंपाकाच्या सिलिंडरबाबत हे सरकार सांगते की दर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या वेळेचेच आहेत. पण त्यावेळी सरकार गॅसवर सबसिडी देत होते. पण आता ती देखील बंद झाली. त्यामुळे नागरिकांचे नुकसान होत आहे. सुषमाजी म्हणायच्या, ‘करन्सी गिरती है, तो देश की प्रतिष्ठा भी गिरती है’, रूपया आज वेगाने घसरत असताना,ते वाक्य एकदम बरोबर असल्याची जाणीव होते. केंद्र सरकारने अगोदर गहू निर्यातीला परवानगी दिली पण तीन दिवसात निर्णय फिरवून निर्यातीवर बंदी घातली. पंतप्रधान ‘ग्रीन कंट्री’चा नारा देत सोलर एनर्जीला प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे सोलर वस्तूंवर १८ टक्के जीसटी लावली जाते. यावरून सरकारच्या धोरणांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते. सुषमाजी म्हणायच्या, ‘आकडों से पेट नहीं भरता, भूख लगती है, तो धान लगता है’, त्यामुळे माझी अर्थमंत्री ज्या स्वतः एक महिला आहेत घर चालवतात, त्यांना महागाईच्या झळा काय असतात. घर कसे चालवायचे असते हे माहिती आहे. त्यांनी कृपया महागाई कमी करुन सामान्य माणसाला दिलासा द्यावा. असंही त्या म्हणाल्या.
Read also
- “मुंबईचा पैसा, मुंबईच वैभव तुम्हाला गिळायचं “? उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
- “लोकशाहीचा विरोध करताना हुकुमशाहीची भलामण संघाने केली”; काॅंग्रेसची भाजपवर जोरदार टिका
- “भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
- “भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
- “भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”