मुंबई : संजय राऊत यांनीच सर्व व्यवहार केलेले आहेत आणि प्रवीण राऊत हे फक्त नावापुरतेच आहेत, असा आरोप ED कडून कोर्टात करण्यात आलेला आहे. म्हाडाकडून 458 रहिवाशांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रवीण राऊत यांच्या कंपनीने 37 लाख हे दादर येथील घरासाठी दिलेले आहेत. त्यानुसार प्रवीण राऊत यांच्याकडून 1 कोटी रुपये संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांना 8 दिवस कोठडी देण्यात यावी. अशी मागणी आज इडीकडून न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने संजय राऊत यांना आता 4 ऑगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत राऊतांचं डिलं झालंय, उद्धव ठाकरेंची पण चौकशी करा; रवी राणा
संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्या मालमत्ता सील करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये राऊत यांचे अलिबाग येथील फार्महाऊस ईडीने सील केला आहे अशी चर्चा होती. मात्र फार्महाऊस ED ने सील केलेला नाही. संजय राऊत यांचे मूळ गांव अलिबागमधील अगरसुरे असून याचठिकाणी त्यांचे फार्महाऊस आहे. संजय राऊत यांना दर महिन्याला 2 लाख रूपये हे प्रवीण राऊत यांच्याकडून दिले जात होते. असं इडीने कोर्टोत सांगितले आहे. तसेच प्रवीण राऊत यांच्या पैशावर संजय राऊत यांनी विदेश दौरे केले. संजय राऊत यांना 3 वेळा समन्स देऊनही ते एकदाही चौकशीला उपस्थित झालेले नाहीत. ते चौकशीला सहकार्य करत नाहीत. असंही इडीने कोर्टात म्हटलं आहे.
इडीने कारवाई केल्यानंतर त्या पैशाचं पुढे काय होतं? कुणाला दिलं जातंय? वाचा सविस्तर
आरोपींनी म्हाडा आणि भाडेकरूंना प्रथम दर्शनी फसवल्याचे दिसून येत आहे आणि या जवळपास 1039 कोटी रुपयांचा पैसा गैरव्यवहार झालेला दिसतोय. असं न्यायालयाने प्रथम निरिक्षण नोंदवलं आहे. तसेच संजय राऊत हे संजय राऊत हे सकाळी 8.30 ते 9.30 वकिलांना भेटू शकतात. सकाळी 10 ते रात्री पर्यन्त आम्ही चौकशी करू. त्यानंतर चौकशी करणार नाही. संजय राऊत हे कोठडीत असताना वकिलांशी सल्लामसलत करण्याची परवानगी द्यावी. संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधे देण्यास आमचा विरोध नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच संजय राऊत यांना केवळ राजकीय द्वेषापोटी अटक करण्यात आली आहे. त्यांना हृदयविकरचा त्रास आहे असं संजय राऊत यांचे वकिल अशोक मुंदरगी यांनी न्यायालयात म्हटलं आहे.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; राजकीय वातावरण तापलं
बिहारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना जे.पी. नड्डा म्हणाले की, आजघडीला भाजपशी लढणारा कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही, आपली खरी लढाी ही घराणेशाहीविरोधात आहे. भाजप हा एका विचारधारेवर लढणारा पक्ष आहे, हा विचार नसता तर आपण इतकी मोठी लढाई लढू शकलो नसतो, हे मी सगळ्यांना वारंवार सांगत असतो. भाजपसमोर सर्वजण नष्ट झाले आहेत. जे झाले नाहीत ते देखील संपतील, केवळ भाजप हा एकमेव पक्ष उरेल असं जे,पी, नड्डा यांनी म्हटलं आहे.
Read also
- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी; सामानाचा आवाज ४ दिवस जेलबंद
- “मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचा असेल, तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध करावा”
- “संजय माझा जुना मित्र, त्याचा मला अभिमान”; उद्धव ठाकरे
- महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हाव्यात : खासदार अमोल कोल्हे
- शरद पवारांचं दोन्ही हात तुरूंगात, आता उद्धव ठाकरें एक गेला, दुसरा लवकरच; किरीट सोमय्या