मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना आज इडीने अटक केली आहे. या अटकेमागे भाजप नेते किरीट सोमय्यांचा मोठा हात असल्याचा बोलण्यात येत आहे. कारण गेल्या अनेक महिन्यापासून किरीट सोमय्या हे संजय राऊतांवर सातत्याने टिका करीत आहेत. तसेच संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात मोठा राजकीय संघर्ष देखील आपापल्या बघायला मिळाला आहे. आता यावरून किरीट सोमय्यांनी शिवसेनेच्या आणखी एका नेत्यांबद्दल सुचक वक्तव्य केलं आहे.
“आज अनेक आत्मे आतून सुखावले असतील”; इडीच्या कारवाईनंतर मिटकरींचा खोचक टोला
संजय राऊत, शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी सर्वांनीच हीच भाषा वापरली होती. त्यानंतर नवाब मलिक असो, अनिल देशमुख असो की संजय पांडे असो सगळ्यांनी हेच म्हटलं होतं. संजय पांडे तुरूंगात आहेत. शरद पवारांचा उजवा हात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. डावा हात अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. उद्धव यांचा उजवा हात संजय राऊत, तर गेला. डावा आता अनिल परबचं पण आता तुरूंगात जाणार असं किरीट सोम्म्यांनी म्हटलं आहे.
“देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील, फक्त भाजपच शिल्लक राहिल”, जे. पी. नड्डा यांचं धक्कादायक वक्तव्य
अनिल परब यांचं बेकायदेशीर हॉटेल तोडलं नाही. हा पैसा कुठुुन आला याचा तपास सुरू आहे. दापोली न्यायालयात अनिल परबांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल झाली आहे. त्याची फायनल ऑर्डर 17 ऑगस्टला आहे असा इशारा देखील किरीट सोमय्यांनी दिला आहे. ही वेगळीच दुसरी कुठली तरी चौकशी सुरू आहे. पत्राचाळचा संबंध नाही याच्याशी, असं म्हटलं जात असल्याचा संदर्भ देत त्यांनी अनेक बड्या नेत्यांना देखील इशारा दिला आहे.
इडीच्या कारवायावरून रोहित पवारांच्या मनात राजकारण सोडण्याचा विचार, म्हणाले…;
“पत्रा चाळ आणि संजय राऊत यांचा काडीमात्र संबंध नाही. ती कुठे आहे? हे संजय राऊत यांना माहित नाही. अटक करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केलं आहे. हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी फ्रेम तयार केली त्यात बोगस कागदपत्रे लावले आहेत. ईडी त्यांचं काम करेल आम्ही आमचं काम करु. असं सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.
Read also
- काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत राऊतांचं डिलं झालंय, उद्धव ठाकरेंची पण चौकशी करा; रवी राणा
- इडीने कारवाई केल्यानंतर त्या पैशाचं पुढे काय होतं? कुणाला दिलं जातंय? वाचा सविस्तर
- माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; राजकीय वातावरण तापलं
- “राऊतांसाठी पवार- मोदींची भेट”, त्याचा उलटा परिणाम, यालाच बहुदा ‘पवारनिती’ म्हणतात”
- “पत्रा चाळ आणि संजय राऊत यांचा काडीमात्र संबंध नाही”; बंधू सुनील राऊतांची प्रतिक्रिया