मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल पत्रावळ चाळ प्रकरणी इडीने अटक केली. काल संजय राऊतांची तब्बल 9 तास चौकशी झाल्यानंतर त्यांच्याकडील जवळपास 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रूपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यानंतर लगेच संजय राऊतांवर ही कारवाई करण्यात आली असून राज्यपालांचा विषय दाबून टाकण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि ईडीवर जोरदार टिका केली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी याप्रकरणी सुचक वक्तव्य केलं आहे.
“महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व”; रवी राणांकडून राज्यपालांची स्तृती
रोहित पवार यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, आज दिवसभरातील राजकीय घडामोडी बघून आठवड्याभरापूर्वी गडकरी साहेबांनी राजकारण सोडण्यासंदर्भात जी भावना बोलून दाखवली होती, तशीच भावना आज माझीही झालीय. परंतु अशी परिस्थिती बदलण्याची ताकद युवांमध्ये असल्याने त्यांच्याकडं पाहून बळ मिळतं. असं त्यांनी म्हटलं आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील मागील काही दिवसात अशा प्रकारचे वक्तव्य केले होते.
“शरद पवारांना माघार घ्यावी लागली, पण अजूनही हे मिशन संपलेलं नाही”
महाराष्ट्राला ‘कोरोना स्प्रेडर’ म्हणून संसदेत हिणवलं गेलं आणि २३ हजार कोटींचा एबीजी शिपयार्ड घोटाळा पुढं आला. तेव्हा १४ फेब्रुवारी रोजी फुले दाम्पत्याबाबत राज्यपालांनी कुत्सितपणे वादग्रस्त विधान करुन लोकांचं लक्ष त्या मुद्द्यावरून दुसरीकडं वळवलं. राज्यात ईडीच्या गैरवापराचा आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा मुद्दा ऐरणीवर होता, तेव्हाही (२७ फेब्रुवारी) महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल महोदयांनी वादग्रस्त विधान करुन मूळ मुद्द्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. आणि आताही राज्यात पूरग्रस्तांना तातडीने द्यावयाच्या मदतीचा मुद्दा तापला असताना आणि मराठा, ओबीसी आरक्षणावरुन लोकांमध्ये संताप असताना (२९ जुलै) मुंबईच्या आर्थिक उभारणीत मराठी माणसाचं योगदान नाकारून राज्यपालांनी महाराष्ट्राचा अवमान करत मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
“राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही.;” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, राज्यात ज्या-ज्या वेळी विविध प्रश्न निर्माण झाले, त्या प्रत्येक वेळी राज्यपालांनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित वादग्रस्त विधानं करून मूळ मुद्द्यावरून लोकांचं आणि माध्यमांचं लक्ष वळवण्याचं काम जाणीवपूर्वक केल्याची शंका लोकांकडून निर्माण केली जातेय. वास्तविक संविधानाला अभिप्रेत असलेला कारभार राज्यात सुरू आहे की नाही हे पाहण्याची राज्यपालांची जबाबदारी असते. पण आज तेच राज्यपाल आपल्या पदाची गरिमा न राखता वादग्रस्त विधाने करून राज्यातील सामाजिक वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आधीही विधानपरिषदेतील आमदारांच्या नियुक्तीच्या संदर्भाने संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला. पण हा महाराष्ट्र स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाची कबर खोदणाऱ्या शिवरायांचा आणि ‘नाठाळाच्या माथी हानू काठी’, असं सांगणाऱ्या तुकोबारायांचा आहे, हे प्रत्येकानेच ध्यानात घ्यायला हवं. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- राज्यपालांना महाराष्टाचा अपमान केला, अन् दुसऱ्याच दिवशी इडीचे पाहुणे राऊतांच्या घरी
- मुख्यमंत्री शिंदे तातडीने औरंगाबादहून दिल्लीला रवाना होणार, दौरा अर्धवट सोडणार
- “शिवसेना ही शिंदेंचीच, मी मेहनतीच्या जोरावर आमदार झालो”; संदिपान भुमरेंचा एल्गार
- “शिवसेना ही शिंदेंचीच, मी मेहनतीच्या जोरावर आमदार झालो”; संदिपान भुमरेंचा एल्गार
- “या काळ्या टोपी खाली दडलय काय? दिल्लीत जा! नाहीतर गुजरातला जा…!”