मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातुन दौऱ्याला सुरूवात केली आहे. दोन दिवसाचा दौरा आहे. यामध्ये एकनाथ शिंदे या दौऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहेत. आज ते वैजापुरला मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी मराठवाड्यातील अधिकाऱ्यांच्याही भेटी घेणार आहेत. शिल्लोडला कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. सगळ्यांना अधिकार आहे. जिकडे तिकडे जाण्याचा त्यामुुळे त्यांना विरोध होणार नाही. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आले, ते तेव्हा आम्ही त्यांचा विरोध केला नाही. मुख्यमंत्री पहिल्यांदा येणार असल्यामुळे त्यांना कोणी विरोध करणार नाही. मुख्यमंत्री फक्त बंडखोर आमदारांच्या मतदार संघातच नाही तर ते महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी दौरे करणार आहेत. शिवसेना ही शिंदेची तर मी मेहनतीच्या जोरावर आमदार झालो, असं बंडखोर आमदार संदिपान भूमरे म्हणाले.
“राज्यपालांचे हे विधान ‘त्या’ हुतात्म्यांचा अवमान करणारे”; सुळेंनीही राज्यपालांना सुनावले खडेबोल
मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रात दौरै करणं हे कामच आहे. आमच्या मतदार संघात उद्धव ठाकरे कितीही वेळा आले तरी त्यांच्या पासून आम्हाला कसलीच भिती नाही. जेवढ्या वेळेस यायचे असेल तेवढ्या वेळेस या आम्हाला कसलीही भिती नाही. निवडणुका आल्यावर तुम्हाला दिसेल किती गर्दी केली होती. बस स्टॅडवरही चार-पाचशे लोक आसतात. त्यामध्ये अनेक पक्षाचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक यामध्ये होते. आदित्य ठाकरे काय बोलणार हे ऐकायला सगळेच येतात. गर्दी करायची असेल तर पैठणला कार्यक्रम करायचा होता असा टोला संदिपान भूमरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर लगावला आहे.
“70 सेकंदमध्ये 27 शिव्या देण्याचा विक्रम संजयच्या नावाने;” व्हायरल क्लिपवरून राणेंचा राऊतांना टोला
पैठण हे विकासाच्या पाठिशी आहे भावनेच्या पाठिशी नाही. आदित्य ठाकरेंना दहा वेळा सांगितले. पैठणसाठी मंत्रालयात बैठक घ्यापण त्यांनी एकदाही बैठक लावली नाही. आता किती आले, किती भावनिक झाले, तरी पैठणची जनता शिंदे यांच्या पाठिशी आहे. निवडणूकांमधून सर्वांना दिसणार आहे. माझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणताही नेता आला नाही, असंही संदिपान भूमरे म्हणाले.
Read also
- “या काळ्या टोपी खाली दडलय काय? दिल्लीत जा! नाहीतर गुजरातला जा…!”
- “महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व”; रवी राणांकडून राज्यपालांची स्तृती
- “शरद पवारांना माघार घ्यावी लागली, पण अजूनही हे मिशन संपलेलं नाही”
- “राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही.;” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण
- “महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे”; अजित पवारांनी राज्यपालांना सुनावलं