मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याआधी राज्यातील थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विषयी कलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. तर आताही अशाच वक्तव्यामुळे राज्यपाल चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी मुंबईतील मराठी माणसांवर निशाणा साधला आहे. यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी याचा निषेध केला आहे. राज्यपाल यांच्यवर लवकर कारवाई करावी अशी मागणी राज्यातील नेत्यांकडून होत आहे.
एकाच नाण्याच्या दोन बाजू; अन् आदित्य ठाकरेंनी अजान सुरू असताना थांबवले भाषण
मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती माणूस मुंबई सोडून गेला तर मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार वायरल होत आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या खासहार सुप्रिया सुळे यांनीही राज्यपाल यांच्यावर निशाणा साधाला आहे.
“बाळासाहेबांचा नातू, उद्धव ठाकरेंचा पुतण्या शिंदेंच्या भेटीला”; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते. याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे. राज्यपाल महोदयांचे हे विधान त्या हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे. हे शहर कष्टकरी, कामगार आणि मजूरांनी कष्टाने उभारले. मुंबईवर पहिला हक्क या सर्वांचा आहे. जो या मातीत जन्माला आला आणि मुंबईवर प्रेम करतो त्या सर्वांसाठी ही ‘आमची मुंबई ‘ आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“त्यामुळे ओबीसी हा सत्तेच्या अन् प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल”; शरद पवारांना चिंता
तर भाजप नेत्यांनी राज्यपाल यांना पाठिंबा दिला आहे. मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही.. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे.. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात, असं भाजपनेते नितेश राणेंनी राज्यपाल यांची पाठराखण केली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते.याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे. pic.twitter.com/0fzigFkhKe
— Supriya Sule (@supriya_sule) July 30, 2022
मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही..
त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे..
त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात..— nitesh rane (@NiteshNRane) July 30, 2022
Read also
- “70 सेकंदमध्ये 27 शिव्या देण्याचा विक्रम संजयच्या नावाने;” व्हायरल क्लिपवरून राणेंचा राऊतांना टोला
- “दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा राज्यपालांनी चांगला चंग बांधलाय”; राष्ट्रवादीचा भाजपला टोला
- “नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये”; मनसेचा राज्यापालांना इशारा
- “मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला तर…;” राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवारांचा इशारा
- जिद्द बाळगणाऱ्या ३१४ अपंगांना लक्ष्मण जगताप व बंधू शंकर जगताप यांचा हात मदतीचा; कृत्रिम हात व पायाचे मोफत वाटप