मुंबई : मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती माणूस मुंबई सोडून गेला तर मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. राज्यातील अनेक नेत्यांकडून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
“त्यामुळे ओबीसी हा सत्तेच्या अन् प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल”; शरद पवारांना चिंता
दरम्यान, महाराष्ट्र भाजपाला राज्यपालांचे हे विधान मान्य आहे का ? राज्यपाल महोदय मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार अपमान का करत आहेत. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे. महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान राज्यपाल महोदय करत आहेत. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जपून बोलण्याचा संकेत देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र,काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जय़ंत पाटलांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
“उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार”;शरद पवार
आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो. असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्र दौरा; आदित्य ठाकरेंना देणार टक्कर ?
ज्या गोष्टीची माहिती नाही. महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, त्यावर बोलू नये, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसण्याची गरज नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फुले शाहु आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे, इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वत:ची प्रगती केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही, असलेच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे, 105 हुतात्म्त्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली आहे. त्यामुळे ज्या गोष्टी माहिती नाही, इतिहास माहिती नाही, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये”; मनसेचा राज्यापालांना इशारा
- “मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला तर…;” राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवारांचा इशारा
- जिद्द बाळगणाऱ्या ३१४ अपंगांना लक्ष्मण जगताप व बंधू शंकर जगताप यांचा हात मदतीचा; कृत्रिम हात व पायाचे मोफत वाटप
- एकाच नाण्याच्या दोन बाजू; अन् आदित्य ठाकरेंनी अजान सुरू असताना थांबवले भाषण
- “बाळासाहेबांचा नातू, उद्धव ठाकरेंचा पुतण्या शिंदेंच्या भेटीला”; राजकीय वर्तुळात एकच चर्चा