नाशिक : राज्यकर्त्यांनी प्राधान्य कशाला द्यायचे हा विचार करायला हवा. राज्यकर्त्यांनी संकटग्रस्त लोकांच्या वेदना जाणून घेण्याची आवश्यकता असते, मात्र आजच्या राज्यकर्त्यांचे प्राधान्य दुसरेच आहे असे मत शरद पवार साहेब यांनी नोंदवले. पवार साहेब आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते ज्या परिसरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, लोक संकटात आहेत अशा ठिकाणी दौरे करत आहेत. स्वागतासाठी, सत्कारासाठी विरोधी पक्ष नेत्यांचे दौरे नाहीत. यातून कोणी काय बोध घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, असा टोलाही पवार साहेबांनी लगावला. ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय हाती आल्याशिवाय भाष्य करणे योग्य नाही. परंतु प्रथमदर्शनी वाचनानंतर परिस्थिती चिंताजनक आहे. ओबीसी हा मोठा वर्ग या सबंध सत्तेच्या आणि प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल अशी चिंता पवार साहेबांनी व्यक्त केली.
“ते दिवस रात्र स्वप्न पाहतात, त्यांना स्वप्नात राहु द्या,”शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर
आगामी निवडणुकांसंबंधीचे स्पष्ट चित्र समोर येण्याची गरज आहे. आमची इच्छा आहे की सहकारी पक्षांशी एकत्रित लढण्याच्या मुद्द्यावर चर्चा करावी. चर्चा करून एकत्रित लढण्याचा निर्णय झाला तर चांगले होईल, असे शरद पवार म्हणाले. मध्यवर्ती निवडणुका होतील अशा चर्चेला उधाण आले असताना उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत. निवडणुका होणार नसतील तरी राज्य एकंदर कोणत्या परिस्थितीत चाललं आहे. त्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. तसेच काही कमतरता आणि चुका असतील, त्यासंबंधीची भूमिका त्या-त्या वेळी घेतली जाईल. आम्ही बांधलेली राजकीय बांधणी अजिबात विस्कळीत होणार नाही हा विश्वास आहे. ज्यावेळी लोकांना कौल देण्याची संधी मिळेल त्यावेळी हे चित्र बदलेल, असे ते म्हणाले.
“महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होईल”; संजय राऊतांचे भाकित
नव्या सरकारच्या स्थापनेनंतर अजूनही खातेवाटप होत नाही, असा प्रश्न माध्यमांकडून विचारला गेला असता, नव्या सरकारचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ते काम समर्थपणे चालवू शकतील, असा आत्मविश्वास आहे, त्यामुळे काम चालू आहे, असा टोला पवार पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली आहे. या निर्णयाविरोधात आम्ही रिव्ह्यू पिटिशन टाकू असे मला सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये सुप्रीम कोर्टात भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि वकील मनवेंद्र सिंह नव्हते. त्यामुळे रिव्ह्यू पिटीशनच्यावेळी त्यांनाही घेऊन जा, अशी मागणी आम्ही केली आहे.”
पुणे महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची आज सोडत; वाचा सविस्तर
पुढे त्यांनी राज्यकर्त्यांच्या कारभारवर बोट ठेवत विकासकामांवर आणलेल्या स्थगितीवरही आपले मत मांडले. कोणीही सत्तेत आल्यावर आपल्या धोरणांनुसार निर्णय घेतात, यावर कोणताही आक्षेप नाही. पण जे प्रकल्प सुरु आहेत, जिथे कामे सुरु झाली, ज्याला मान्यता आहे, टेंडर काढले आहेत, त्या सगळ्या गोष्टी थांबणे म्हणजे प्रत्यक्ष या प्रकल्पांना विलंब लावण्यासारखे आहे. हे योग्य नसल्याचे भुजबळ म्हणाले.
Read also
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्र दौरा; आदित्य ठाकरेंना देणार टक्कर ?
- “वाह रे भाजप, कुणी बार चालवतंय, तर कुणी कुंटणखाना”; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा
- मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी..; अजित पवारांनी थेट बांधावरून मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले
- “आता फक्त उद्धव ठाकरेंसाठी काम करणार”; शिक्षकांनी सेनेसाठी दिला राजीनामा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही दे धक्का..