पुणे : महाराष्ट्रातील 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र या निडणुकांना कोणत्याही प्रकारचे ओबीसी आरक्षण देता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पाऊस स्थितीमुळे 92 नगर परिषदा व 4 नगर पंचायतींमधील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांचा नवा निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना त्यामध्ये ओबीसी आरक्षण देता येणार नाही, असं केल्यास न्यायालयाचा अवमान कारवाई करण्यात येईल असा इशारा न्यायालयाने दिला आहे.
शिंदे गटाला मोठा धक्का! बंडखोर खासदाराच्या घटस्फोटीत पतीचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
राज्यातील 92 नगर परिषदा व चार नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत आज निघणार आहे. यापूर्वीचे एससी व एसटी प्रवर्गाचे आरक्षण कायम ठेवून उर्वरित आरक्षण नव्याने काढण्यात येणार असल्याने पुन्हा राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
“उद्धव ठाकरेंनी नगरसेवक, आमदारकीसाठी उभं राहावं अन् निवडून दाखवावं”; दिपक केसरकर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या 58 प्रभागांमधील ओबीसींच्या 46 जागांसाठी आज बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत निघणार आहे.
मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील; विखे पाटलांचा राऊतांवर निशाणा
भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड आणि उस्मानाबाद या ‘अ’ वर्गातील नगर परिषदा मनमाड, सिन्नर, येवला, दोंडाईचा वरवाडे, शिरपूर वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड,पैठण, अंबेजोगाई, मजलगाव, परळी वैजनाथ, अहमदपूर आणि अंजनगाव या ‘ब’ गटातील नगरपरिषदा आदि निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाला नव्याने निर्णय घ्यावा लागणार आहे.
Read also
- “संजय राऊत काय आहे,? हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे”
- “मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सारखं दिल्लीला जावं लागत, ही फार मोठी शोकांतिका”
- “स्मृती ताई, नको त्या विषयावर बेंबीच्या देठापासून बोलतात”
- एकनाथ शिंदे यांचे झंझावत दौरे; 30 जुलैपासून संपुर्ण महाराष्ट्र फिरणार
- सर्वोच्च न्यायालयाने आनंदावर पाणी फेरलं; आगामी काही निवडणुकां ओबीसी आरक्षणाशिवाय