मुंबई : देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी करण्यात आल्याने संसदेत आज जोरदार गदारोळ बघायला मिळाला. दिल्लीत एका आंदोलनाच्या वेळी काॅंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. त्यावरून भाजपने हा मुद्दा संसदेत उपस्थित करत काॅंग्रेसवर चहुबाजूंनी हल्लाबोल केला. तसेच त्यांनी देशाची माफी मागावी असं देखील म्हटलं आहे. यावरून राज्यातील भाजपनेत्यांनी देखील त्यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी स्मृती ईराणी यांच्यावर प्रखर शब्दात टिका केली आहे.
“धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना शोभत नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका”
काँग्रेस खासदार बंगाली असल्याने चुकून राष्ट्रपती ऐवजी राष्ट्रपत्नी शब्द बाहेर पडले. तात्काळ काँग्रेस खासदारने माफी दिलगिरी व्यक्त केली, पण कधीही विकासाची कामे न करणारी भाजप नेहमी प्रमाणे धर्म,जात,पात नामांतर या विषयावर ,सभागृहात गोंधळ घालून पावन झाली. स्मृती ताई नको त्या विषयावर बेंबीच्या देठापासून ,नुसते आरोप करण्याचे काम दिल्ली पासूनच ट्रेनिंग दिले असल्याचे जाणवते असंही रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
“चुक झाली असेल तर फासावर लटकावा, पण यात सोनिया गांधींना ओढू नका”
एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेली काँग्रेसला का पाहवत नाही ? त्यातूनच काँग्रेस गट नेते अधीर रंजन चौधरी यांनी महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मर्मू यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला. हा केवळ मूर्खपणा नाही या मागे अत्यंत हलकट मानसिकता आहे. असं म्हणत चित्रा वाघ य़ांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. याप्रकरणावरून संसदेत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन व स्मृती ईराणी यांनी काॅंग्रेसवर चांगलाच प्रहार केला. काॅंग्रेस नेत्यांचं हे वक्तव्य त्यांच्या पक्षाच्या विचारांची पातळी दर्शवतं. काॅंग्रेस ही आदिवासी आणि महिलांच्या विरोधात आहे हे सर्वांनीच माहिती आहे. चौधरी यांनी मुर्मूी यांना राष्ट्रपत्नी असं संबोधून हेच अधोरेखित केलं आहे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांना आपल्या गटात घेण्याचा शिंदेंचा मोठा प्लॅन; ठाकरेंना धक्क्यावर धक्के
दरम्यान, देशात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतांना दिसत आहे. काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची काल नॅशनल हेराल्ड प्रकरणी इडीने चौकशी केली. देशातील महागाई, भाववाढ आणि इतर मुद्दांना भरकटवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोनिया गांधी यांना इडीकडून चौकशी सुरू आहे. त्याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पडणार हे मात्र नक्की होतं. आणि सध्या तेच होताना दिसत आहे.
Read also
- एकनाथ शिंदे यांचे झंझावत दौरे; 30 जुलैपासून संपुर्ण महाराष्ट्र फिरणार
- सर्वोच्च न्यायालयाने आनंदावर पाणी फेरलं; आगामी काही निवडणुकां ओबीसी आरक्षणाशिवाय
- शिंदे गटाला मोठा धक्का! बंडखोर खासदाराच्या घटस्फोटीत पतीचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
- “उद्धव ठाकरेंनी नगरसेवक, आमदारकीसाठी उभं राहावं अन् निवडून दाखवावं”; दिपक केसरकर
- मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील; विखे पाटलांचा राऊतांवर निशाणा