मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करत सरकार स्थापन केले. तर शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजुन झालेला नाही. यावरून विरोधी पक्ष शिंदे सरकारवर वारंवार टीका करत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे शिंदे सरकारकडून दुर्लक्षित केले जात आहे. असा आरोप विरोधी पक्षनेते सातत्याने करीत आहेत.
“चुक झाली असेल तर फासावर लटकावा, पण यात सोनिया गांधींना ओढू नका”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात दौरे करणार आहेत. 30 जुलैपासुन मुख्यमंत्री राज्यातील ठराविक ठिकाणी दौरे करणार आहेत. राज्यातील पुरगस्त भागाची पाहणी आणि इतर लोकोपयोगी कामांचा आढावा घेणार आहेत. असं शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी सांगितले आहे. राज्यातील जनतेचा आपल्याला पाठिंबा असल्याचे एकनाथ शिंदे राज्यभर दौरा करणार असल्याचे बोलले जात आहे.
बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांना आपल्या गटात घेण्याचा शिंदेंचा मोठा प्लॅन; ठाकरेंना धक्क्यावर धक्के
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात दौरा करणार आहेत. 30 जुलैपासुन मुख्यमंत्री राज्यात ठीक ठीकाणी भेट देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात 30, 31 जुलै आणि 2 ऑगस्ट या दिवशी काही भागात दौरा करणार आहेत. राज्यातील पुरग्रस्त भागातील पाहणी करणार आहेत. या आधीही मुख्यमंत्री यांनी पुरगस्त भागातील जिल्हाधिकारी व सरकरी अधिकाऱ्यांशी ऑनलाईन चर्चा केली होती.
बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांना आपल्या गटात घेण्याचा शिंदेंचा मोठा प्लॅन; ठाकरेंना धक्क्यावर धक्के
याचसोबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद, सिल्लोड, येवला, वैजापूर, पुणे या भागात स्थानिक पातळीवरचे प्रश्न ऐकून, सर्व घटकातील समस्या आणि निवेदन देखील स्वीकराणार आहेत. मुख्यमंत्री हे आधी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्यासोबत आढावा घेणार आहेत. याचप्रमाणे विकास कामातील आढावा, कार्यकर्ता मेळावा देखील होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
Read also
- सर्वोच्च न्यायालयाने आनंदावर पाणी फेरलं; आगामी काही निवडणुकां ओबीसी आरक्षणाशिवाय
- शिंदे गटाला मोठा धक्का! बंडखोर खासदाराच्या घटस्फोटीत पतीचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
- “उद्धव ठाकरेंनी नगरसेवक, आमदारकीसाठी उभं राहावं अन् निवडून दाखवावं”; दिपक केसरकर
- मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील; विखे पाटलांचा राऊतांवर निशाणा
- “धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना शोभत नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका”