मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. यानंतर या फुटीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचं बोलल जात आहे. यावरून शिवसेना ही शरद पवार यांनी नाही तर देवेंद्र फडणवीसांनी कटकारस्थान रचून शिवसेना फोडली, असा घाणाघात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्र सदनात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीची राष्ट्रिय कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी त्यांनी राष्ट्रवादीवरचे आरोप खोडून काढले आहेत.
“राज्यपालांचे हे विधान ‘त्या’ हुतात्म्यांचा अवमान करणारे”; सुळेंनीही राज्यपालांना सुनावले खडेबोल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना फोडली असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर देताना विद्या चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आमदार सुरतला पळून गेले. जर बारामतीला आले असते तर आम्ही म्हटले असते, की शरद पवारांनी शिवसेना फोडली, असा टोलाही विद्या चव्हाण यांनी लगावला आहे. महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होती. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
“70 सेकंदमध्ये 27 शिव्या देण्याचा विक्रम संजयच्या नावाने;” व्हायरल क्लिपवरून राणेंचा राऊतांना टोला
शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्यावर आरोप करून मोकळे व्हायचे, असा त्यांचा कार्यक्रम आहे. शरद पवारांवर टीका केली, की प्रसिद्धीही मिळते. बंडखोर आमदार एकीकडे भाजपाशासित गुजरात राज्यातील सुरतमध्ये जातात आणि दुसरीकडे शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणतात, यावरून त्यानी शिवसेनेतील बंडखोर आमदार आणि भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
“दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा राज्यपालांनी चांगला चंग बांधलाय”; राष्ट्रवादीचा भाजपला टोला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून ही विद्या चव्हाण यांनी टिका केली आहे. या काळ्या टोपी खाली दडलय काय? महाराष्ट्राचा द्वेष, तिरस्कार दुसरं काय राज्यपाल पदावर आहात म्हणून खूप सन्मान झाला…! आता चालते व्हा Go Back दिल्लीत जा नाहीतर! गुजरातला जा! छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आता तुम्हाला ठेवणार नाही ! मराठी माणसाचा हिसका आणि ठसका आता सावित्रीच्या लेकीच दाखवतील! मोठे मोठे व्यापारी, उद्योगपती, टाटा, बिर्ला पासून मुंबईत महाराष्ट्रात मोठे झाले! पण त्यांनी कष्टकऱ्यांचा सन्मानच केला! पण कोश्यारी राज्यपाल पदावर बसून कष्टकरी मराठी माणसाचा व देशभरातून मुंबईत कष्ट उपसणाऱ्या माणसाच्या श्रमाचा अपमान करणार असतील तर त्यांची हकालपट्टी करा, अशी टीका विद्या चव्हाण यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी केली आहे.
Read also
- “शरद पवारांना माघार घ्यावी लागली, पण अजूनही हे मिशन संपलेलं नाही”
- “राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही.;” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण
- “महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे”; अजित पवारांनी राज्यपालांना सुनावलं
- आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला सावरकर नाव दिल्याने राष्ट्रवादी आक्रमक ; थेट शाहु महाराजांच्या नावाने फलक चिटकवले