धुळे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासाच्या वाटचासलीत मराठी माणसाचं श्रेय सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रातही मराठी माणसाने प्रगती केली आहे. जगभरात मराठी माणसाचं नाव झालं आहे. राज्यपाल काय बोलले त्याबाबत ते खुलासा करतील. परंतु आम्ही राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये”; मनसेचा राज्यापालांना इशारा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे जिल्ह्यातील दौऱ्यांवर आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. गुजराती, मारवीडी इतर समाज असेल वेगवेगळ्या समाजाचं योगदान नाकारत नाही. परंतु महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूस, मराठी साहित्यिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मराठी लोकांचा सहभाग जास्त आहे. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अतिशयोक्ती वापरली जाते. तसेच राज्यपाल बोलले असेल. या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात मराठी माणसाचं योगदान सार्वाधिक आहे हे राज्यपालांनाही माहित आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती माणूस मुंबई सोडून गेला तर मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. राज्यातील अनेक नेत्यांकडून या वक्तवय्याचा निषेध केला जात आहे.
महाराष्ट्रात सध्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि विकासात वाढ नाही तर वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यपाल महोदय यांचं वक्तव्य हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहेच, त्याच सोबत ह्या मातीत जन्मलेल्या अनेक थोर व्यक्तींच्या योगदान आणि बलिदानाचा देखील अनादर आहे. या वक्तव्याची निंदा करावी तितकी कमीच… महाराष्ट्र आणि मराठी विरोधी भूमिकेसाठी त्यांनी जाहीर माफी मागावी असं शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे”; अजित पवारांनी राज्यपालांना सुनावलं
- आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला सावरकर नाव दिल्याने राष्ट्रवादी आक्रमक ; थेट शाहु महाराजांच्या नावाने फलक चिटकवले
- “राज्यपालांचे हे विधान ‘त्या’ हुतात्म्यांचा अवमान करणारे”; सुळेंनीही राज्यपालांना सुनावले खडेबोल
- “70 सेकंदमध्ये 27 शिव्या देण्याचा विक्रम संजयच्या नावाने;” व्हायरल क्लिपवरून राणेंचा राऊतांना टोला
- “दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा राज्यपालांनी चांगला चंग बांधलाय”; राष्ट्रवादीचा भाजपला टोला