मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याआधी राज्यातील थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विषयी कलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. तर आताही अशाच वक्तव्यामुळे राज्यपाल चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी मुंबईतील मराठी माणसांवर निशाणा साधला आहे. यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी याचा निषेध केला आहे. राज्यपाल यांच्यवर लवकर कारवाई करावी अशी मागणी राज्यातील नेत्यांकडून होत आहे.
“नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये”; मनसेचा राज्यापालांना इशारा
मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये. महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे… खरा वीर वैरी पराधीनतेचा. महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा. असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांचा समाचार घेतला.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती माणूस मुंबई सोडून गेला तर मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार वायरल होत आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या खासहार सुप्रिया सुळे यांनीही राज्यपाल यांच्यावर निशाणा साधाला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते. याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे. राज्यपाल महोदयांचे हे विधान त्या हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे. हे शहर कष्टकरी, कामगार आणि मजूरांनी कष्टाने उभारले. मुंबईवर पहिला हक्क या सर्वांचा आहे. जो या मातीत जन्माला आला आणि मुंबईवर प्रेम करतो त्या सर्वांसाठी ही ‘आमची मुंबई ‘ आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Read also
- “माझं स्वागत गदा देऊन करण्यात आले, पण, गदा आपण पहिलेच चालविली”; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
- आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला सावरकर नाव दिल्याने राष्ट्रवादी आक्रमक ; थेट शाहु महाराजांच्या नावाने फलक चिटकवले
- “राज्यपालांचे हे विधान ‘त्या’ हुतात्म्यांचा अवमान करणारे”; सुळेंनीही राज्यपालांना सुनावले खडेबोल
- “70 सेकंदमध्ये 27 शिव्या देण्याचा विक्रम संजयच्या नावाने;” व्हायरल क्लिपवरून राणेंचा राऊतांना टोला
- “दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा राज्यपालांनी चांगला चंग बांधलाय”; राष्ट्रवादीचा भाजपला टोला