पुणे : गेल्या काही दिवसापासून शिरूरमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अजितदादा गटाकडून जोरदार टिका केली जात आहे. यातच ज्या अमोल कोल्हे यांच्यासाठी मागच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी जीव तोडून काम केलं. खिशातून पैसे खर्च करून रात्रीचा प्रचार केला. त्या खासदाराने आम्हाला कधी चहाला सुद्धा बोलवलं नाही. अशी खंत खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी व्यक्त केली. यावेळी मोहिते पाटलांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका देखील केली.
अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच मेहनत घेतली. परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं सुद्धा नाही. ज्या गावात आम्ही त्यांच्यासाठी प्रचार केला. त्या गावात ते पाच वर्षात फिरकलेच नाहीत. निधान आभार देखील मानायला त्या गावात जायला पाहिजे होते. परंतु ते देखील त्यांनी केलं नाही. मुळात हा नट आहे आणि नाटकं कसं रंगवायचं हे त्याच्याकडून शिकावं. त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी समोरासमोर बसावं आणि पाच वर्षात काय काम केलं ते त्यांनी सांगावं. असेही दिलीप मोहिते पाटील म्हणाले.
हेही वाचा…पुण्यात पारंपारिक पद्धतीने दवंडी देऊन मोदींच्या सभेचं निमंत्रण
आमच्याकडे हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकरांचे अनेक बैठका झाल्यात. त्यासाठी त्यांनी किती बैठका घेतल्या ? काय चर्चा केल्या. त्यात त्यांचं किती योगदान आहे. ते त्यांनी सांगावं. आज लोकांना ते खोटं सांगताहेत. भावनिक आव्हान करत आहेत. जर ते खरोखर शेतकऱ्याचे पुत्र असते तर त्यांनी खरी परिस्थिती सांगावी. आजच कांद्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ते सांगत आहेत. गेल्या पाच वर्षात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला नाही का ? गेल्या पाच वर्षांमध्ये दुधाचा प्रश्न निर्माण झाला नाही का ? त्यावेळेला काय किती आंदोलन केली ? त्याच्याकरता किती बैठका घेतल्यात ? असा सवाल देखील त्यांनी केला.
दरम्यान, मागच्या निवडणुकीत आम्ही २०१४ ला खेड तालुक्यात दीड लाखाचं मताधिक्क दिलं होतं. ते तोडून मागच्या वेळेला आम्ही मोठं मताधिक्क देऊन अमोल कोल्हेंना निवडून दिलं होतं. आता तर आमच्यासोबत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटलांना मोठं मताधिक्क मिळणार असा दावा देखील त्यांनी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…“भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले, भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच”
हेही वाचा…“नरेंद्र मोदींमुळे २०१४ नंतर देशाने गतिमान प्रगती केली” , आढळराव पाटलांचं मोठं विधान
हेही वाचा…“यापुर्वीच कर्तृत्व सिद्ध संधी मिळाली असती तर..”, सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली ‘ती’ खंत
हेही वाचा…“खासदार निधीसुद्धा वापरता येत नाही असा निष्क्रिय खासदार”, तटकरेंचा गीतेंवर घणाघात