मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याआधी राज्यातील थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विषयी कलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. तर आताही अशाच वक्तव्यामुळे राज्यपाल चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी मुंबईतील मराठी माणसांवर निशाणा साधला आहे. यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी याचा निषेध केला आहे. राज्यपाल यांच्यवर लवकर कारवाई करावी अशी मागणी राज्यातील नेत्यांकडून होत आहे.
“राज्यपालांचे हे विधान ‘त्या’ हुतात्म्यांचा अवमान करणारे”; सुळेंनीही राज्यपालांना सुनावले खडेबोल
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जे वक्तव्य केले आहे ते भौगोलिक दृष्ट्या केलं असेल. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. मुंबई हे देशातील सर्वात हायटेक शहर आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईची सुरूवात गिरणी कामगारांपासून झाली होती. मात्र त्यानंतर तिथे अनेक व्यापारी आणि जाती धर्माचे लोक आलेत. त्यामुळे मुंबईचा विकास करण्यात सर्वाचा हातभार आहे. मुंबई ही सर्वांची आहे. असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.
“70 सेकंदमध्ये 27 शिव्या देण्याचा विक्रम संजयच्या नावाने;” व्हायरल क्लिपवरून राणेंचा राऊतांना टोला
कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं मात्र गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
“दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा राज्यपालांनी चांगला चंग बांधलाय”; राष्ट्रवादीचा भाजपला टोला
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते. याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे. राज्यपाल महोदयांचे हे विधान त्या हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे. हे शहर कष्टकरी, कामगार आणि मजूरांनी कष्टाने उभारले. मुंबईवर पहिला हक्क या सर्वांचा आहे. जो या मातीत जन्माला आला आणि मुंबईवर प्रेम करतो त्या सर्वांसाठी ही ‘आमची मुंबई ‘ आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Read also
- “मी जर मुलाखत दिली तर भूकंप होईल”; एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला
- “शरद पवारांना माघार घ्यावी लागली, पण अजूनही हे मिशन संपलेलं नाही”
- “राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही.;” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण
- “महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे”; अजित पवारांनी राज्यपालांना सुनावलं
- आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला सावरकर नाव दिल्याने राष्ट्रवादी आक्रमक ; थेट शाहु महाराजांच्या नावाने फलक चिटकवले