मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगाव दौऱ्यावर आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सत्कार समारंभ आणि इतर कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री शिंदे्ं उपस्थित आहेत. या कार्यक्रमात केलेल्या भाषणातुन शिंदे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आम्ही चुकलो असतो, तर लोकांनी आम्हाला समर्थन दिले नसते, आम्हाला गाडीतुन जाताना तोंड फिरवावे लागले असते. त्याचबरोबर मी जर मुलाखत दिली तर भूकंप होईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला आहे.
“70 सेकंदमध्ये 27 शिव्या देण्याचा विक्रम संजयच्या नावाने;” व्हायरल क्लिपवरून राणेंचा राऊतांना टोला
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची शिवसेना पुढे न्यायची आहे. तर आनंद दिघे यांच्याबाबतीत राजकारण झाले आहे. आनंद दिघे यांच्या बाबतीत जे झालं त्याचा मी पुरावा आहे. त्याचा लवकरच खुलासा करणार आहे, असा इशारा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील आम्हाला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी माझे संपुर्ण भाषण ऐकले, मनापासुन आपण भाषण केेले असं मोदी म्हणाले. तुम्ही लढवय्ये आहात, बाळासाहेबांचे नाव उज्ज्वल कराल, असं नरेंद्र मोदी म्हणाले असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा राज्यपालांनी चांगला चंग बांधलाय”; राष्ट्रवादीचा भाजपला टोला
मी स्वत:ला भाग्यवान समजतो की विविध कार्यक्रमांना मी हजर होतो. ज्या ठिकाणी मी गेलो, तेथे रस्त्याच्या दुतर्फा हजारो माणसे होती. हात उंचावून त्यांनी माझे स्वागत केल्याचेही शिंदे यांनी सांगितले. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास त्यांनी दिला आसा दावा शिंदे यांनी केला आहे. तर आम्ही कोणालाही पळवले नाही, आम्ही कोणाचाही विरोध करत नाही, हिदुत्व पुढे घेऊन जात आहोत. याबरोबरच आषढी एकादशीची पुजा करायला मी पंढरपुरला गेलो हातो, भाग्य लागते त्यासाठी, असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
“नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये”; मनसेचा राज्यापालांना इशारा
मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती माणूस मुंबई सोडून गेला तर मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. याविषयी मुख्यमंत्री यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यपाला्चाया वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. या विषयावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका परखड आहे. तीच आमची भूमिका आहे. मुंबई साठी 106 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले आहे. मुंबईच्या उभारणीत मराठी माणसाचे योगदान व त्याग आहे. त्यामुळे तीच विकास झाला आहे. येथे सगळ्यांचे स्वागत केले जाते. मात्र मराठी माणसांचा कोणीही अवमान करू नये. तसे केल्यास आम्ही सहन करण्याचा प्रश्नच नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Read also
- “शरद पवारांना माघार घ्यावी लागली, पण अजूनही हे मिशन संपलेलं नाही”
- “राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही.;” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण
- “महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे”; अजित पवारांनी राज्यपालांना सुनावलं
- आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला सावरकर नाव दिल्याने राष्ट्रवादी आक्रमक ; थेट शाहु महाराजांच्या नावाने फलक चिटकवले
- “राज्यपालांचे हे विधान ‘त्या’ हुतात्म्यांचा अवमान करणारे”; सुळेंनीही राज्यपालांना सुनावले खडेबोल