मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर इडीने कारवाई केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपचे ग्रामीण कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला तर मुंबईत देखील मातोश्री बाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तसेच राज्यातील विविध भागात शिवसैनिकांना संजय राऊतांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला आहे. यातच आता अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
“देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील, फक्त भाजपच शिल्लक राहिल”, जे. पी. नड्डा यांचं धक्कादायक वक्तव्य
इडी ही एक सक्षण यंत्रणा असून ज्या राज्यात ज्या सरकारने घोटाळे केले आहेत. अशा लोकांवर इडी ही कारवाई करीत आहे. सात आठ महिन्यांपासून चौकशी सुरू होती पुरावे समोर आले म्हणून इडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे. अनिल परब यांची देखील चौकशी सुरू आहे. घोटाळ्याचे फाईलही चार्ज झाले आहेत. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून मोठं डिलं झालं आहे. त्यामुळे काही लिंक मातोश्रीपर्यंत जाणार असतील तर उद्धव ठाकरे यांची देखील चौकशी झाली पाहिजे. असंही रवी राणां यांनी म्हटलं आहे.
इडीच्या कारवायावरून रोहित पवारांच्या मनात राजकारण सोडण्याचा विचार, म्हणाले…;
अपेक्षेप्रमाणे ईडी नावाचे पाहुणे संजय राऊत यांच्या घरी भल्या पहाटे दाखल झाले आणि एक हाती किल्ला लढवणाऱ्या व प्रत्येकवेळी शिवसेनेसोबत एकनिष्ठ असणाऱ्या शिवसैनिकावर कारवाई सुरु केली. आज अनेक आत्मे आतून सुखावले असतील. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तसेच राऊत इडीला घाबरून भाजपला शरण गेले नाहीत. राज्यपालाच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाने ची ही नवी खेळी . आज ईडीचे पाहुणे संजय राऊत यांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
राज्यपालांना महाराष्टाचा अपमान केला, अन् दुसऱ्याच दिवशी इडीचे पाहुणे राऊतांच्या घरी
राज्यपालांच्या वक्तव्यावरून व शेतकऱ्यांना अजुनही भरीव मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या सरकारविरुद्ध असलेल्या रोषावरून चर्चा भरकटली पाहिजे म्हणुन भाजपा ने ईडीचा सुनियोजत कट रचलाय. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा फैसला पुन्हा लांबणीवर अर्थात, १ ऑगस्ट ऐवजी ३ ऑगस्टवर गेला आहे. न्यायालयाचा निकाल काहीही आला तरी तो भाजपच्याच पथ्यावर पडेल. सरकार बेकायदेशीर ठरले तर राष्ट्रपती राजवट लागेल. दुसरा कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही. राष्ट्रपती राजवट आल्यावर प्रशासक राज्यपाल नेमतील तो “भाजपवालाच” असेल. विधान परिषदेच्या 12 आमदारांची प्रलंबित यादी राज्यपाल झटकन मंजुर करतील ते बाराही आमदार “भाजपवालेच”असतील आणि शिंदे गटाच्या बाजूने निर्णय गेला तरी सरकारवर वर्चस्व “भाजपचेच” असेल. असा खोचक शाब्दिक हल्ला देखील त्यांनी केला.
Read also
- इडीने कारवाई केल्यानंतर त्या पैशाचं पुढे काय होतं? कुणाला दिलं जातंय? वाचा सविस्तर
- माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; राजकीय वातावरण तापलं
- “राऊतांसाठी पवार- मोदींची भेट”, त्याचा उलटा परिणाम, यालाच बहुदा ‘पवारनिती’ म्हणतात”
- “पत्रा चाळ आणि संजय राऊत यांचा काडीमात्र संबंध नाही”; बंधू सुनील राऊतांची प्रतिक्रिया
- “आज अनेक आत्मे आतून सुखावले असतील”; इडीच्या कारवाईनंतर मिटकरींचा खोचक टोला