पुणे । विशेष प्रतिनिधी उत्तरप्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्र्यांनी कारकीर्द गावजली आहे. मात्र, महाराष्ट्र हिरक महोत्सव साजरा करीत असताना अद्याप महिला मुख्यमंत्री झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे झालेल्या पाहायला आवडेल, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या आहेत.
“पत्रा चाळ आणि संजय राऊत यांचा काडीमात्र संबंध नाही”; बंधू सुनील राऊतांची प्रतिक्रिया
राज्यातील सत्ता बदलानंतर महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. मात्र, महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे द्यावी, अशी मागणी होत होती. मात्र, सुळे यांनी त्यावेळी राज्याच्या राजकारणा रस नाही, असे सांगितले. परंतु, राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सुरूवातीला अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि उर्वरित अडीच वर्षे राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद राहील, असा समझोता झाल्याचे बोलले जाते. परंतु, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे राष्ट्रवादीची मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा यशस्वी होवू शकली नाही. दरम्यान, झी-मराठी वाहिनीच्या ‘बस बाई बस’च्या सेटवर कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अभिनेता सुबोध भावे यांनी सुळेंची संवाद साधला. या कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांची चित्रफीत दाखवण्यात आली.
“आज अनेक आत्मे आतून सुखावले असतील”; इडीच्या कारवाईनंतर मिटकरींचा खोचक टोला
कार्यक्रमात बोलताना कोल्हे म्हणाले की, मी खासदार झालो तेव्हा मोठ्या बहिनीप्रमाणे संसद, संसद सदस्या यांची ओळख करुन देणाऱ्या सुप्रिया ताई जबाबदारीची जाणीवही करुन देतात. देशातील १२ कोटी लोकांमधून केवळ ५४३ लोकांना संसदेत बसण्याची संधी मिळते. त्यापैकी तुम्ही एक आहात. लोकांसाठी काम करा, असा सल्लाही सुप्रियाताई देतात. देशातील उत्तरप्रदेश, बिहार, तमिळनाडू, गुजरातला महिला मुख्यमंत्री लाभलेल्या आहेत. मात्र, हिरकमहोत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणातील भावी मुख्यमंत्री म्हणून मी सुप्रिया सुळेंकडे पाहतो.
“देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील, फक्त भाजपच शिल्लक राहिल”, जे. पी. नड्डा यांचं धक्कादायक वक्तव्य
खासदार कोल्हेंच्या विधानाने राष्ट्रवादीत अस्वस्थता…
राज्यातील राजकीय पटलावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार त्यांनी सक्षमपणे सांभाळला. आता महाविकास आघाडी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत असताना अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत २०२४ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यास अजित पवार हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार राहणार आहेत. परंतु, सुप्रिया सुळे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी कायम चर्चेत ठेवण्यासाठी राष्ट्रवादीतील एक गट सक्रीय आहे. परिणामी, राष्ट्रवादीतील अजित पवार गटाची अस्वस्थता वाढली असून, हे राष्ट्रवादीला परवडणारे नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Read also
- शरद पवारांचं दोन्ही हात तुरूंगात, आता उद्धव ठाकरें एक गेला, दुसरा लवकरच; किरीट सोमय्या
- काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत राऊतांचं डिलं झालंय, उद्धव ठाकरेंची पण चौकशी करा; रवी राणा
- इडीने कारवाई केल्यानंतर त्या पैशाचं पुढे काय होतं? कुणाला दिलं जातंय? वाचा सविस्तर
- माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; राजकीय वातावरण तापलं
- “राऊतांसाठी पवार- मोदींची भेट”, त्याचा उलटा परिणाम, यालाच बहुदा ‘पवारनिती’ म्हणतात”