मुंबई : मला एका गोष्टीचा अभिमान आहे. अडीच वर्षाच्या काळात माझ्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाची हवा कधी गेली नाही. शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे, लोकांशी नेहमी नम्र राहा. आता जे सत्तेत आहेत त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसेच त्यांनी संजय राऊतांवर झालेल्य़ा कारवाईबाबत देखील त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“राऊतांसाठी पवार- मोदींची भेट”, त्याचा उलटा परिणाम, यालाच बहुदा ‘पवारनिती’ म्हणतात”
हिंदुत फुट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची, राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचं कारस्थान भेसूरपणे करताना दिसत नाही. तेव्हा आणीबाणीला देशआला अनुशासन पाहिजे त्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तेव्हा जेव्हा राजकारणाशी संबंध नव्हता. पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत या साहित्यांक विचारवंत यांना लोकशाहीच्या होमकुंडात उडी मारली होती. लोकशाही जिवंत ठेवली होती. तसेच एक दलाल बोलला यांना आमदार आणि खासदार शोधावे लागतात. पण माझ्या सोबत दमदार आणि वफादार आहेत. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“पत्रा चाळ आणि संजय राऊत यांचा काडीमात्र संबंध नाही”; बंधू सुनील राऊतांची प्रतिक्रिया
माझा जुना मित्र तसेच कट्टर शिवसैनिक आहे. त्याच्या कुटुंबीयांना भेटून आलो आहे. लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. तो एक पत्रकार देखील असून शिवसैनिक निर्भिड असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे पटत नाही ते बोलतोय, मरण आलं तरी शरण जाणार नाही, हे त्याचं वाक्य चांगलं आहे. तोही शरण जाऊ शकला असता पण जे शरण झाले हमाममध्ये गेले अंघोळीला गेले असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
“आज अनेक आत्मे आतून सुखावले असतील”; इडीच्या कारवाईनंतर मिटकरींचा खोचक टोला
जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे. तोपर्यंत गेलेले आमच्यावर टिका करू शकतात. फेस गेल्यावर परिस्थितीची जाणीव होईल. त्यानंतर काय आहे हे लोकांसमोर येईल. केवळ सोबत येतील ते नाही तर जे गुलाम होतील ते काही काळ आपले काम संपल्यावर नवीन गुलाम येतील, हे गुलाम गुलामगिरीकडे वाटचाल आहे. त्याचा निषेध केला पाहिजे. जे पी, नड्डा यांनी केलेले वक्तव्य अत्यंत महत्वाचे आहे. कारण त्यांच्या तोंडातून ते सत्य बाहेर आलं आहे. तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असला तर दिवस सर्वांचे सारखे नसतात दिवस फिरतात. दिवस फिरले तर याचा विचार नड्डा आणि भाजपने करावा, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Read also
- महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हाव्यात : खासदार अमोल कोल्हे
- शरद पवारांचं दोन्ही हात तुरूंगात, आता उद्धव ठाकरें एक गेला, दुसरा लवकरच; किरीट सोमय्या
- काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत राऊतांचं डिलं झालंय, उद्धव ठाकरेंची पण चौकशी करा; रवी राणा
- इडीने कारवाई केल्यानंतर त्या पैशाचं पुढे काय होतं? कुणाला दिलं जातंय? वाचा सविस्तर
- माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; राजकीय वातावरण तापलं