मुंबई : देशात एक नेता,एक झेंडा व एक विचारधारा रहावी ही संघाची भूमिका आहे. लोकशाहीचा विरोध करताना हुकुमशाहीची भलामण संघाने केली. हुकुमशाही सरकारच्या माध्यमातून संघाची ध्येयपूर्ती हा भाजपाचा अजेंडा आहे. नड्डांनुसार देशात एकच पक्ष राहणे म्हणजे नागरीकांचे प्रजाकरण होय- धोका जनतेने ओळखावा ईडीची अनेकांना भीती आहे आणि घाबरल्या नंतरचा सुटकेचा मार्ग आपल्याकडे येण्याचा दिसतो हे ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. असं मत काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मांडलं.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी; सामानाचा आवाज ४ दिवस जेलबंद
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना बिहारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना जे.पी. नड्डा म्हणाले की, आजघडीला भाजपशी लढणारा कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही, आपली खरी लढाी ही घराणेशाहीविरोधात आहे. भाजप हा एका विचारधारेवर लढणारा पक्ष आहे, हा विचार नसता तर आपण इतकी मोठी लढाई लढू शकलो नसतो, हे मी सगळ्यांना वारंवार सांगत असतो. भाजपसमोर सर्वजण नष्ट झाले आहेत. जे झाले नाहीत ते देखील संपतील, केवळ भाजप हा एकमेव पक्ष उरेल. त्यावर सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचा असेल, तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध करावा”
संसदीय बहुपक्षीय लोकशाही ही देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, सामाजिक, भाषिक विविधतेचे प्रतिनिधित्व करते. देशातील प्रादेशिक पक्ष संपुष्टात यावे ही मानसिकता लोकशाहीविरोधी तर आहेच पण या देशातील विविधतेला अमान्य करणारी आहे. संघाने सातत्याने संघराज्य व्यवस्थेचा विरोध केला आहे. असंदेखील सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी जे.पी. नड्डा यांच्यावर या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे.
“संजय माझा जुना मित्र, त्याचा मला अभिमान”; उद्धव ठाकरे
प्रादेशिक पक्ष राज्यांतर्गत अस्मिता जपण्याचे काम करत असतात. त्यांना संपवण्याची आसुरी महत्त्वाकांक्षा भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहीर केली आहे. हा छुपा अजेंडा सत्तेत आल्यापासून भाजप राबवत आहेच… तरी आता उघडपणे बोलण्यापर्यंत भाजप अध्यक्षांची मजल गेली आहे. “महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत आहे आणि देशात फक्त भाजप हाच पक्ष शिल्लक राहील”, ही भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच आहे. असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
Read also
- “भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
- “भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
- “भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”
- “भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”
- संजय राऊत यांना हृदयविकरचा त्रास; तुरूंगात घरचे जेवण, औषध देण्यास परवानगी