मुंबई : बिहारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना जे.पी. नड्डा म्हणाले की, आजघडीला भाजपशी लढणारा कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही, आपली खरी लढाी ही घराणेशाहीविरोधात आहे. भाजप हा एका विचारधारेवर लढणारा पक्ष आहे, हा विचार नसता तर आपण इतकी मोठी लढाई लढू शकलो नसतो, हे मी सगळ्यांना वारंवार सांगत असतो. भाजपसमोर सर्वजण नष्ट झाले आहेत. जे झाले नाहीत ते देखील संपतील, केवळ भाजप हा एकमेव पक्ष उरेल. त्यावरून आता राज्यातील नेत्यांनी त्यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
“संजय माझा जुना मित्र, त्याचा मला अभिमान”; उद्धव ठाकरे
भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या तरी शिवसेना कधीच संपणार नाही. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सातत्याने सांगत आहेत की भाजपाला शिवसेना संपवायची आहे, हेच आज नड्डा यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. महामहिम राज्यपालांच्या कालच्या वक्तव्यामागे भाजपा आहे हे देखील समोर आले आहे आणि जे गद्दार शिवसेना आमची आहे असे म्हणतात त्यांचे काय होणार, हे ही आता महाराष्ट्राच्या लक्षात आले. त्यांना आता भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही. असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हाव्यात : खासदार अमोल कोल्हे
जे पी नड्डा जे बोलले ते वक्तव्य भविष्यात भाजपसाठीच मोठा “खड्डा” ठरेल. त्यांना वाटते तितकी सोपी ही गोष्ट नाही. या देशात हुकूमशाही नाही तुम्हीं कितीही फडफड केली तरी संविधानाला धक्का लाऊ शकणार नाही. हे लक्षात ठेवा. असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. प्रादेशिक पक्ष राज्यांतर्गत अस्मिता जपण्याचे काम करत असतात. त्यांना संपवण्याची आसुरी महत्त्वाकांक्षा भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहीर केली आहे. हा छुपा अजेंडा सत्तेत आल्यापासून भाजप राबवत आहेच… तरी आता उघडपणे बोलण्यापर्यंत भाजप अध्यक्षांची मजल गेली आहे. “महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत आहे आणि देशात फक्त भाजप हाच पक्ष शिल्लक राहील”, ही भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच आहे. असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांचं दोन्ही हात तुरूंगात, आता उद्धव ठाकरें एक गेला, दुसरा लवकरच; किरीट सोमय्या
प्रादेशिक पक्ष राज्यांतर्गत अस्मिता जपण्याचे काम करत असतात. त्यांना संपवण्याची आसुरी महत्त्वाकांक्षा भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहीर केली आहे. हा छुपा अजेंडा सत्तेत आल्यापासून भाजप राबवत आहेच… तरी आता उघडपणे बोलण्यापर्यंत भाजप अध्यक्षांची मजल गेली आहे. “महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत आहे आणि देशात फक्त भाजप हाच पक्ष शिल्लक राहील”, ही भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच आहे.
Read also
- “भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”
- “भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”
- संजय राऊत यांना हृदयविकरचा त्रास; तुरूंगात घरचे जेवण, औषध देण्यास परवानगी
- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी; सामानाचा आवाज ४ दिवस जेलबंद
- “मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचा असेल, तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध करावा”