मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल पत्रावळ चाळ प्रकरणी इडीने अटक केली. काल संजय राऊतांची तब्बल 9 तास चौकशी झाल्यानंतर त्यांच्याकडील जवळपास 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रूपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. अशातच आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
शरद पवारांचं दोन्ही हात तुरूंगात, आता उद्धव ठाकरें एक गेला, दुसरा लवकरच; किरीट सोमय्या
प्रादेशिक पक्ष राज्यांतर्गत अस्मिता जपण्याचे काम करत असतात. त्यांना संपवण्याची आसुरी महत्त्वाकांक्षा भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहीर केली आहे. हा छुपा अजेंडा सत्तेत आल्यापासून भाजप राबवत आहेच… तरी आता उघडपणे बोलण्यापर्यंत भाजप अध्यक्षांची मजल गेली आहे. “महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत आहे आणि देशात फक्त भाजप हाच पक्ष शिल्लक राहील”, ही भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच आहे.
काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत राऊतांचं डिलं झालंय, उद्धव ठाकरेंची पण चौकशी करा; रवी राणा
यातील दुसरा मुद्दा म्हणजे, शिवसेनेचा अंत होत असल्याच्या वक्तव्यावर आता राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. कारण महिन्याभराहून जास्त चाललेल्या सत्तानाट्यात मुख्यमंत्री व त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांनी वारंवार आम्हीच खरी शिवसेना असा गजर माध्यमांमधून आणि न्यायालयीन प्रक्रियेतही चालवला आहे. मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा निषेध करत आपल्या पक्षाची अस्मिता जपण्यासाठी भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत ते आता दाखवणार का? अन्यथा मूग गिळून गप्प बसायचे असेल तर आम्ही शिवसेनेच्या रक्षणासाठी बाहेर पडलो, आम्हाला सत्तेचा मोह नाही, अशी दुटप्पी भूमिका तरी जनतेसमोर मांडणे त्यांनी थांबवावे. असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
इडीने कारवाई केल्यानंतर त्या पैशाचं पुढे काय होतं? कुणाला दिलं जातंय? वाचा सविस्तर
बिहारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना जे.पी. नड्डा म्हणाले की, आजघडीला भाजपशी लढणारा कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही, आपली खरी लढाी ही घराणेशाहीविरोधात आहे. भाजप हा एका विचारधारेवर लढणारा पक्ष आहे, हा विचार नसता तर आपण इतकी मोठी लढाई लढू शकलो नसतो, हे मी सगळ्यांना वारंवार सांगत असतो. भाजपसमोर सर्वजण नष्ट झाले आहेत. जे झाले नाहीत ते देखील संपतील, केवळ भाजप हा एकमेव पक्ष उरेल असं जे,पी, नड्डा यांनी म्हटलं आहे.
Read also
- संजय राऊत यांना हृदयविकरचा त्रास; तुरूंगात घरचे जेवण, औषध देण्यास परवानगी
- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी; सामानाचा आवाज ४ दिवस जेलबंद
- “मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचा असेल, तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध करावा”
- “संजय माझा जुना मित्र, त्याचा मला अभिमान”; उद्धव ठाकरे
- महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हाव्यात : खासदार अमोल कोल्हे