मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल पत्रावळ चाळ प्रकरणी इडीने अटक केली. काल संजय राऊतांची तब्बल 9 तास चौकशी झाल्यानंतर त्यांच्याकडील जवळपास 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रूपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यानंतर लगेच संजय राऊतांवर ही कारवाई करण्यात आली असून राज्यपालांचा विषय दाबून टाकण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि ईडीवर जोरदार टिका केली आहे.
संजय राऊत यांना हृदयविकरचा त्रास; तुरूंगात घरचे जेवण, औषध देण्यास परवानगी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या घरी इडीचे पाहुणे दाखल झाले. हे काय चालले आहे? हे सगळे कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चालले आहे की लाज लज्जा, शरम सोडून देशात दडपशाही सुरू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू व महाराष्ट्राची माती काय असते, मराठी माणसाचा पराक्रम काय असतो, हे अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ, असा निर्धार देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी; सामानाचा आवाज ४ दिवस जेलबंद
मुंबईचा पैसा, मुंबईच वैभव तुम्हाला गिळायचं आहे, हे तुम्ही उघडपणाने सांगितलं याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. ३ वर्ष महाराष्ट्रात राहून त्या मीठाशी नमक हरामी करणे, हे कोश्यारी या व्यक्तिला शोभत नाही. त्यांनी राज्यपाल या पदाची शान घालवली आहे. या सरकारने राज्यपालांबद्दल भूमिका घ्यायला पाहिजे, हे जे काय पार्सल आपल्याकडे पाठवले आहे. हे पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल, मराठी माणसाचा अपमान करत असेल तर यांचा योग्य तो निर्णय घेतला जावा, ही माझी तमाम मराठी आणि हिंदूंच्यावतीने मागणी आहे. मुंबईचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची ओळख संपूर्ण जगाला आहे. पण महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविणाऱ्या या व्यक्तिला नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर टिकास्त्र सोडलं आहे.
“मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचा असेल, तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध करावा”
गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भुखंड आहे. इडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्सट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित कऱण्याचे काम देण्यात आले. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला, असा आरोप करण्यात येत आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. गुरू आशिष कन्सट्रक्शनला पत्राचाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी 672 एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 तसेच 2013 मध्ये भुखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरीत करण्यात आले. असं सांगण्यात येत आहे.
Read also
- “लोकशाहीचा विरोध करताना हुकुमशाहीची भलामण संघाने केली”; काॅंग्रेसची भाजपवर जोरदार टिका
- “भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
- “भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
- “भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”
- “भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”