हिंगोली : राज्यातील बंडखोर आमदारांवरील अंसतोष शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका देखील घेतली आहे. अशातच आता हिंगोलीचे शिवसेनेचे नेते बबनराव थोरात यांनी शिवसैनिकांना केलेल्या आव्हानामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्यांना बंडखोर आमदारांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
हिंगोलीचे शिवसेनेचे नेते बबनराव थोरात यांनी गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची एकच चर्चा रंगली आहे. बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणा देखील दिल्या. त्यावेळी त्यांनी संतोष बांगर, खासदार हेमंत पाटी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गद्दार अशा घोषणा दिल्या. संतोष बांगर आता माझ्या कानाखाली आवाज काढा. एक वेळ नाही तर हजार वेळ गद्दार म्हणतो. असं म्हणत संदेश देशमुख यांनी देखील बंगार यांना इशारा दिला.
“मुंबईचा पैसा, मुंबईच वैभव तुम्हाला गिळायचं “? उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
यानंतर संतोष बांगर यांनी देखील आव्हान केलं आहे. माझी गाडी फोडणं तर सोडाच माझ्या गाडीला नुसतं टच जरी केलं तर आमदारकीचा राजीनामा देईन, तसेच त्यांनी बबनराव थोरात यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. बबन थोरात यांने हिंगोली, बीड, नांदेड, आणि नंदुरबारच्या अनेकांकडून लाखो रूपये उकळलेत. त्यामुळे याला हिंगोलीच्या संपर्क पदावरून हटवलं होतं. हे उद्धव ठाकरे यांना सुद्धा माहिती होत. त्याचबरोबर आमच्या गाड्या तुम्ही काय फोडता, आमच्या गाड्या तुमच्या घरापुढे आणून उभ्या करतो. स्पर्थ जरी करून दाखवला तर हा संतोष बांगर आमदारकीचा राजीनामा देईन, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
“लोकशाहीचा विरोध करताना हुकुमशाहीची भलामण संघाने केली”; काॅंग्रेसची भाजपवर जोरदार टिका
दरम्यान, यावेळी नवं निर्वाचित हिंगोलीचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची आणि काॅंग्रेसमधून घरवापसी केलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शहरातून जंगी मिरवणुक काढण्यात आली. शिवसैनिकांनी जोरदार सत्कार केला. यावेळी हजारो शिवसैनिक उपस्थित होते. त्याच कार्यक्रमात त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरादार टिका केली.
Read also
- “गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल”
- दोन मंत्र्यांच्या जम्बो कॅबिनेटमध्ये खरा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल
- “दारूवरचा कर कमी केला, पण पेट्रोल डिझेलवरचा कर कमी केला नाही”; विखे पाटलांचा सुळेंना टोला
- “चुकीचं प्रायश्चित्त म्हणून कृपया महाराष्ट्रातून चालते व्हा”; राष्ट्रवादीचा राज्यपालांना इशारा
- “दत्त अन् दत्ताची गाय सोडून सरकारने सगळ्याच गोष्टीवर जीएसटी लावला”; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर हल्लाबोल