नवी दिल्ली : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल संसदेत केंद्र सरकार महागाईवर हल्लाबोल केला. त्यात सुप्रिया सुळे यांनी मराठी कविता सादर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने जीएसटी परिषदेला पत्र लिहून जीवनावश्यक वस्तूंवर लावलेल्या जीएसटीला विरोध केला होता. यावरून आता भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
“भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
सुप्रिया सुळे यांनी जी कविता म्हटली, याचा मला आनंदच आहे, पण ती कविता पुर्णपणे राष्ट्रवादी काॅंग्रेसलाच लागू होते. कारण त्यांनी सरकारमध्ये असताना ना दुध सोडलं. ना तुप सोडलं, ना लोणी सोडलं. त्यांनी काहीच सोडलं नाही. त्यांनी गाय देखील सोडली नाही. आम्ही किमान गायीवर तरी टॅक्स लावला नाही, पण त्यांनी गायदेखील सोडली नाही, असं माझं ठामपणे मत आहे, अशी टीका सुजय विखे पाटील यांनी केली आहे. इतके दिवस आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर किमती कमी करण्याची मागणी आम्ही करीत होतो. पण त्यांनी दारूवरचा कर कमी केला. पण पेट्रोल डिझेलवरचा कर कमी केला नाही.
“भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
आरोप-प्रत्यारोप होत असताना सुप्रिया सुळेंनी सुंदर उदाहरण दिलं आहे. पण हीच राष्ट्रवादी काॅंग्रेसची पंरपरा राहिलेली आहे. त्यांनी दुधातून निघणारा कोणताही पदार्थ सोडलेला नाही. सत्तेच्या माध्यमातून जे-जे काही काढता येईल, मग तो पैसा असेल, भ्रष्टाचार असेल, वेगवेगळ्या पक्षातून लोकांचं प्रवेश करणं असेल, दबावतंत्र वापरणं असेल, लोकांवर गुन्हे दाखल करून पक्षप्रवेश करून घेणं असो, असे अनेक प्रकार त्यांनी केले, असा टोला देखील त्यांनी लगावला.
“भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”
कृती दुबे या एका सहा वर्षाच्या मुलीने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ती तिच्या महाग झालेल्या पेन्सिलबाबत तक्रार करते. हे अतिशय महत्त्वाचे आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा देणाऱ्या सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लहानपणी आम्हाला एक कविता होती, ‘दत्त दत्त, दत्ताची गाय, गाईचे दूध, दूधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याचे तूप’ अशा त्यातील काही ओळी होत्या. या कवितेतील आज दत्त आणि गाय सोडले तर सर्व गोष्टींवर सरकारने जीएसटी आकारला.सरकारने जीवनावश्यक वस्तू जीएसटीमध्ये आणल्या. हे आवर्जून नमूद केले. महागाईवर चर्चा करीत असतात माननीय मंत्रीमहोदय म्हणतात की, “आम्ही देशातील गरीबाला गहू दिला. त्याबद्दल आभार मानणार नाही का?” त्यांचे हे विधान दुर्देवी आहे. कारण दोन वेळेचे अन्न हा त्या सामान्य माणसाचा अधिकार आहे. त्याला अन्न देणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. मग येथे तुम्ही आभाराची अपेक्षा कशी धरु शकता? सतत वाढत्या दराबाबत हे सरकार जीएसटी परिषदेकडे बोट दाखविते.
Read also
- “चुकीचं प्रायश्चित्त म्हणून कृपया महाराष्ट्रातून चालते व्हा”; राष्ट्रवादीचा राज्यपालांना इशारा
- “दत्त अन् दत्ताची गाय सोडून सरकारने सगळ्याच गोष्टीवर जीएसटी लावला”; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर हल्लाबोल
- “दत्त अन् दत्ताची गाय सोडून सरकारने सगळ्याच गोष्टीवर जीएसटी लावला”; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर हल्लाबोल
- “मुंबईचा पैसा, मुंबईच वैभव तुम्हाला गिळायचं “? उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
- “लोकशाहीचा विरोध करताना हुकुमशाहीची भलामण संघाने केली”; काॅंग्रेसची भाजपवर जोरदार टिका