पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात मुंबई बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यात राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. तर महाराष्ट्रातून चालते व्हा. असा सुर देखील राज्यपालांच्या विरोधात बघायला मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेची माफी मागत राज्यपालांनी पत्र लिहिलं. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पुणे शहाराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्यपालांनी महाराष्ट्र सोडून जाण्याचा इशारा दिला आहे.
“भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
भगतसिंग कोश्यारी यांना उशिरा का असेना पण आपण चूक कबूल केलीत हे ऐकून समाधान वाटलं. आता या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून आपण कृपया महाराष्ट्रातून चालते व्हा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आपल्यासारख्या उथळ, टुकार माणसाच्या वास्तव्याने महाराष्ट्राची बदनामी होत आहे. कृपया चालते व्हा. असं म्हणत त्यांनी राज्यपालांना महाराष्ट्रात सोडण्यास सांगितले आहे.
“भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”
आधी महाराष्ट्राच्या विरोधात कुजबुज मोहिमा चालायच्या, बंद दाराआड कट रचले जायचे, षंढपणे ते कट अंमलात आणले जायचे. मराठी माणसाने यांकडे दुर्लक्ष केलं, महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्यांना डोक्यावर घेतलं. परिणाम??? मराठी माणसाच्या पाठीवर होणारे वार आता थेट छातीवर होऊ लागलेत. कोश्यारी हा माणूस बोलून चालून उपराच…. त्याची तळी उचलणारे राणे, वाघ, केसरकर हे खरे अस्तनीतले निखारे आहेत. महाराष्ट्राला खरा धोका यांच्यापासून आहे. असा इशाराही त्यांनी दिला.
संजय राऊत यांना हृदयविकरचा त्रास; तुरूंगात घरचे जेवण, औषध देण्यास परवानगी
दरम्यान, राज्यपालांनी घडलेल्या प्रकरणाबद्दल एक पत्र लिहून माफी मागीतली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा चूक अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो. असंही त्यात म्हटलं होतं.
Read also
- “दत्त अन् दत्ताची गाय सोडून सरकारने सगळ्याच गोष्टीवर जीएसटी लावला”; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर हल्लाबोल
- “दत्त अन् दत्ताची गाय सोडून सरकारने सगळ्याच गोष्टीवर जीएसटी लावला”; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर हल्लाबोल
- “मुंबईचा पैसा, मुंबईच वैभव तुम्हाला गिळायचं “? उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
- “लोकशाहीचा विरोध करताना हुकुमशाहीची भलामण संघाने केली”; काॅंग्रेसची भाजपवर जोरदार टिका
- “भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”