मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. या दोन मंत्र्यांच्या जम्बो कॅबिटनेटमध्ये खरा मुख्यमंत्री कोण ? असा सवाल जनतेला पडला आहे. असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणात म्हटलं आहे. आदित्य ठाकरे सध्या कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान त्यांनी शिंदे सरकारवर कडाडून टिका केली आहे.
“लोकशाहीचा विरोध करताना हुकुमशाहीची भलामण संघाने केली”; काॅंग्रेसची भाजपवर जोरदार टिका
सावंतवाडीतून येत होतो त्या ठिकाणी मी पर्यटन फंड दिला होता. त्याला स्थगिती आताच्या सरकारने दिली आहे. आदिवासी खात्याच्या जीआरला स्थगिती मिळाली आहे. पण त्यातून महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. पण स्थगिती द्यायला हे सरकार वैध आहे का? हे सरकार काळजीवाहू असेल तर ठिक आहे. पण ते किती घटनेला धरून आहे? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.
“भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली होती. ते फक्त एक आमदार आहेत. त्याच्या पलीकडे ते कोणी नाहीत. असा निशाणा साधला होता. त्यावर प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हाला एकटं पाडण्याचा कट सुरू होता. ४० लोकांचा हा कट होता. पण आम्हाला जनता एकटं पाडणार नाही. त्यांचे बुरखे फाटत आहेत. त्यांचं खरं स्वरूप येत आहे. त्यांना कारवाी टाळायची होती. त्यामुळे ते आता बोलत आहेत. पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी तानाजी सावंत यांना सुनावलं.
“भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. तर अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांवर जाहीर भाषणातून निशाणा साधत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून बंडखोर आमदार देखील आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करीत आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या देखील आता पत्रकार परिषदा सत्र वाढलेलं दिसून येत आहे.
Read also
- “दारूवरचा कर कमी केला, पण पेट्रोल डिझेलवरचा कर कमी केला नाही”; विखे पाटलांचा सुळेंना टोला
- “चुकीचं प्रायश्चित्त म्हणून कृपया महाराष्ट्रातून चालते व्हा”; राष्ट्रवादीचा राज्यपालांना इशारा
- “दत्त अन् दत्ताची गाय सोडून सरकारने सगळ्याच गोष्टीवर जीएसटी लावला”; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर हल्लाबोल
- “दत्त अन् दत्ताची गाय सोडून सरकारने सगळ्याच गोष्टीवर जीएसटी लावला”; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर हल्लाबोल
- “मुंबईचा पैसा, मुंबईच वैभव तुम्हाला गिळायचं “? उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप