मुंबई : सत्ताधीशवाले इडी आणि सीबीआयशिवाय काहीही करू शकत नाहीत. ते तुम्हाला तुरूंगात टाकतील नाहीतर तुम्हाला मारून टाकू शकतात. असा गौप्यस्फोट काॅंग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी केलं आहे. गेल्या अनेक महिन्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक राज्यकीय नेत्यांवर कारवाई केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दोन मंत्र्यांच्या जम्बो कॅबिनेटमध्ये खरा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल
मी सत्तांतराच्या वेळी बोलली तेव्हा मला भाजपच्या मोठ्या नेत्याचा फोन आला होता. ते मला या सर्व प्रकरणाबाबत बोलत होते. त्यावर मी त्यांनी विचारलं की, असं बोलणं बरोबर नाही. मी म्हटले की मला तुम्ही धमकी देता का ? असं म्हणत यशोमती ठाकुर यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तसेच जे सत्तेत बसले आहेत. ते दोनच काम करू शकतात. एक तर तुमच्यावर इडी किंवा सीबीआय लावू शकतात. नाहीतर बंदुक घेऊन मारून ठाकू शकतात. असा गंभीर आरोप यशोमती ठाकुर यांनी केला आहे.
“दारूवरचा कर कमी केला, पण पेट्रोल डिझेलवरचा कर कमी केला नाही”; विखे पाटलांचा सुळेंना टोला
त्याच बरोबर त्यांनी या संदर्भात गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकरांचा दाखला दिला. त्यांच्या मारेकऱ्यांचा अजुनही शोध लागला आहे का? पानसरे. दाभोलकर यांना न्याय मिळाला आहे का ? असा सवाल देखील यशोमती ठाकुर यांनी उपस्थित केला आहे.
“चुकीचं प्रायश्चित्त म्हणून कृपया महाराष्ट्रातून चालते व्हा”; राष्ट्रवादीचा राज्यपालांना इशारा
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल इडीने अटक केली आहे. त्यांच्या घरावर छापा टाकत जवळपास 11 लाख रूपयांची रोकड इडीने जप्त केली आहे. त्याचबरोबर काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देखील इडीने चौकशी साठी बोलवले होते. त्यानंतर आता लगेचच नॅशनल हेराल्डवर इडीने आज छापा टाकला. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपच गैरवापर केला जात आहे. असा आरोप त्यांनी लावला.
Read also
- एकटेच मुख्यमंत्री सर्व खात्यांना न्याय कसा देणार? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
- “रात्री दहानंतर लाऊडस्पीकर लावता कामा नयेत”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना रोखठोक इशारा
- मनसेला एकनाथ शिंदेंनीच पाडलं मोठं खिंडार; 100 पदाधिकाऱ्यांचा मनसेला जय महाराष्ट्र
- “माझ्या गाडीला साधा टच जरी झाला, तरी राजीनामा देईन”; संतोष बांगर अन् सेनेच्या नेत्यांमधील वाद विकोपाला
- “गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल”