पुणे : मागील पाच वर्षात शिरूर मतदारसंघात एक रुपयाचा देखील निधी आणला नाही. 80 टक्के खासदार निधी वाया गेला. विद्यमान खासदार मतदारसंघात फिरकलेच नाहीत. असे अनेक गावात अमोल कोल्हे यांच्या विरोधात बॅनर लागले आहेत. असा निष्क्रिय खासदार पराभूतच होणार आहे. दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, अशी टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली.
हेही वाचा…शिंदेंकडून नाही तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, शांतिगीरी महाराजांची एकच चर्चा
शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आज मांजरी परिसरात प्रचार रॅली आयोजित करण्यात आली. मांजरी बुद्रुक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. वाजत गाजत काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी यामध्ये आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे आदी उपस्थित होते.
हेही वाचा…“त्यासाठी विद्यमान खासदारांनी काय पाठपुरावा केला? राणाजगजीतसिंह पाटलांचा खोचक सवाल
यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, विद्यमान खासदार पाच वर्षात एकदाही मतदार संघात उपस्थित राहिले नाही. त्यांचा 80 टक्के निधी परत गेला आहे. शिवाय केंद्रातून एकही रुपयाचा निधी त्यांना आणता आला नाही. गावोगावी त्यांच्या विरोधातील फलक लावले आहे. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांच्या विषयी आक्रोश आहे. आज पर्यंत मी केलेल्या प्रचाराला उस्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माझ्या प्रचाराला मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता हडपसर मतदारसंघातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…नगरमध्ये मोठा उलटफेर, वंचितसह MIM , अपक्ष उमेदवार निलेश लंकेंची माघार
हेही वाचा…“कारखाना वाचवायचा असेल तर..,” फडणवीसांसोबत भेट झाल्यानंतर अभिजित पाटलांचं सुचक वक्तव्य
हेही वाचा…“खेडका मंत्री लयच बोलायला लागलाय”, ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांवर पलटवार
हेही वाचा…“प्रेमाचा वर्षाव हा मला भारावून टाकणारा”, सुनेत्रा पवारांचा खडकवासला दौरा चर्चेत