नगर : गेल्या काही दिवसात आरोप-प्रत्यारोपात चर्चेत ठरत असलेल्या दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी एमआयएमचे डॉ. परवेश अशरफी यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे दिलीप कोंडिबा खेडकर, अपक्ष उमेदवार निलेश साहेबराव लंके यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना अधिकच उधाण आल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा…“त्यासाठी विद्यमान खासदारांनी काय पाठपुरावा केला? राणाजगजीतसिंह पाटलांचा खोचक सवाल
दक्षिण नगरमधून अपक्ष उमेदवार निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीचे उमदेवार निलेश लंके यांनी भाजपचे विद्यमान खासदार उमेदवार सुजय विखे पाटलांवर टिकेची झोड उठवली होती. यातच एमआयएमकडून डॉ. परवेज अशरफी यांनी देखील उमेदवारी अर्ज सादर केला होता. तर वंचितकडून दिलीप कोंडिबा खेडकर यांनी देखील उमेदवारी अर्ज सादर केला होता. त्यावरून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला होता. मध्यंतरी झालेल्या जाहीर सभांमधून देखील लंकेंनी विखेंवर तिकट वार केला.
हेही वाचा…“नरेंद्र मोदी पुण्यात येतील अन् म्हणतील की,..” सभेआधीच शरद पवारांनी मोदींना डिवचलं
अशातच आता या सर्व उमेदवारांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नगरमधील राजकीय वर्तुळात याची एकच चर्चा सुरू झाली आहे. यावर आता निलेश लंके आणि सुजय विखे पाटलांकडून काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने याठिकाणी आता निलेश लंके विरूद्ध सुजय विखे पाटील यांच्या थेट लढत होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कारखाना वाचवायचा असेल तर..,” फडणवीसांसोबत भेट झाल्यानंतर अभिजित पाटलांचं सुचक वक्तव्य
हेही वाचा…“खेडका मंत्री लयच बोलायला लागलाय”, ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांवर पलटवार
हेही वाचा…“प्रेमाचा वर्षाव हा मला भारावून टाकणारा”, सुनेत्रा पवारांचा खडकवासला दौरा चर्चेत
हेही वाचा…शिंदेंकडून नाही तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, शांतिगीरी महाराजांची एकच चर्चा